Friday, March 29, 2024

‘मी नशिबवान आहे देवाने मला ‘ती’ बाल्कनी दिली’, म्हणत शाहरुख खानने मानले देवाचे आणि प्रेक्षकांचे आभार

बॉक्स ऑफिसचा बेताज बादशाह शाहरुख खानच असल्याचे पुन्हा एकदा ‘पठाण’च्या निमित्ताने शाहरुखने सिद्ध करून दाखवले आहे. पठाण सिनेमाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पहिल्यांदाच सिनेमाची संपूर्ण टीम मीडियासमोर आली. या चर्चेमध्ये शाहरुख, दीपिका आणि जॉन यांनी मीडियासोबत मनमोकळा संवाद साधला. यावेळी त्यांनी मीडियाच्या सर्वच प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी शाहरुख खानने बरीच मोठ्या काळापासून त्याच्या मनात असलेली गोष्ट सर्वांसमोर व्यक्त केली. शाहरुख खान मागील अनेक महिन्यांपासून किंबहुना वर्षांपासून मीडियासमोर आलाच नव्हता या दरम्यान त्याच्या आयुष्यात आणि त्याच्याशी संबंधित अनेक मोठ्या घटना घडल्या. आता त्याने अप्रत्यक्षरीत्या काही बाबींवर भाष्य केले आहे. आर्यन खान अंमली पदार्थांच्या खोट्या केसमध्ये अडकल्यानंतर त्याला जे सांगायचे होते ते तो या निमित्ताने बोलला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

शाहरुख खान म्हणाला, “आनंदात तर लोकं आपल्या लोकांना भेटतात. वयस्कर लोकांनी सांगितले आहे , दुखी असाल तर त्यांच्याजवळ जा जे तुमच्यावर प्रेम करतात. बस हेच मी केले. माझ्याकडे लाखो असे लोकं आहेत जे माझ्यावर प्रेम करतात. जेव्हा मी आनंदी असतो तेव्हा माझ्या घराच्या बाल्कनीमध्ये येतो, आणि दुखी असतो तेव्हा देखील माझ्या बाल्कनीमध्ये येतो. मी खूप नशीबवान आहे की देवाने मला या बाल्कनीचे तिकीट दिले आहे.” पुढे तो म्हणाला, “सामान्यपणे चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होतात आणि रविवारपर्यंत तुम्हाला समजून जाते की, सिनेमा हिट झाला आहे की फ्लॉप. जर रविवारी सिनेमा चालला नाही तर सोमवारी मी विचार करतो की आता अजून मेहनत घ्यावी लागेल. आगामी सिनेमात अजून मी चांगले काम कसे करू. मात्र मला वाटते सिनेमा हिट असो वा फ्लॉप रविवार खूप एन्जॉय करा आणि मग सोमवारी विचार करा पुढे कशी आणि किती मेहनत घ्यायची आहे. बस म्हणूनच आम्ही आजच्या भेटीसाठी सोमवार निवडला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दीपिका बद्दल बोलताना शाहरुख खान म्हणाला, “शूटिंगच्या वेळी सर्व लोकं हेच बोलायचे की हा सिनेमा माझ्यासाठी अर्थात शाहरुख भाईसाठी सर्वात चांगला राहो. मात्र संपूर्ण सेटवर एकच दीपिका होती जी मला भाई बोलत नाही.” पुढे तो ‘डर’ सिनेमाबद्दल म्हणाला, “‘डर’ सिनेमाने माझ्या करियरला एक वळण दिले. या सिनेमानंतर आदित्य चोप्रा मला म्हणाला आता आपण एक ऍक्शन सिनेमा करू. त्यानंतर चार वर्षांनी त्याने मला कॉल केला आणि मला’दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’ स्क्रिप्ट ऐकवली. पुढे त्याने मला ‘दिल तो पागल है’ दिला आता अखेर त्याने माझ्यासोबत ऍक्शन असलेला ‘पठाण’ केला.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

या दरम्यान शाहरुख खानने दीपिका, जॉनसोबत खूप मस्ती केली. अनेक भावुक क्षणदेखील या चर्चेत आले. शाहरुख खानने सलमानचे देखील यावेळी आभार मानले.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
पडद्यावरची पार्टनर ते आयुष्यभराची अर्धांगिनी, ‘अशी’ होती रमेश देव आणि सीमा देव यांची लव्हस्टोरी

सुकेशच्या आधी चाहत खन्नाचे नाव जाेडले गेले ‘या’ प्रसिद्ध गायकासोबत; 2 घटस्फाेटानंतर कुठे आहे अभिनेत्री?

 

हे देखील वाचा