सलमान खानच्या ‘वीर’ सिनेमाचे निर्माता असलेल्या विजय गिलानी यांचे दुःखद निधन झाले आहे. बुधवार (२९ डिसेंबर) रोजी रात्री त्यांनी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. सलमान खान, अमृता सिंग, शिबा या तिघांना घेऊन त्यांनी ‘सूर्यवंशी’ हा सिनेमा तयार केला. त्यानंतर २०१० साली ‘वीर’ सिनेमा देखील त्यांनी सलमानसोबत केला. विजय मागील काही महिन्यांपासून ब्लड कॅन्सरने ग्रस्त होते. ते कॅन्सरवर लंडन इथे उपचार करत होते.
एका मोठ्या वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार विजय गिलानी हे ब्लड कॅन्सरने पीडित झाल्यानंतर साधारण तीन महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या कुटुंबासोबत लंडन इथे जात बॉन मॉरो ट्रान्सप्लांट केले होते.या ऑपरेशनच्या काही महिने आधीच त्यांना कॅन्सर झाल्याचे लक्षात आले होते. दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी सांगितले की, विजय गिलानी यांचा मुलगा प्रतीक गिलानी हा काही दिवसांपूर्वीच भारतात आला होता. मात्र आता विजय यांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर तो पुन्हा लंडनला रवाना झाला.
विजय गिलानी यांनी अक्षय कुमार (Akshay Kumar), बॉबी देओल (Bobby Deol), करीना कपूर (Kareena Kapoor) आणि बिपाशा बसु (Bipasha Basu) यांच्या २००१ साली आलेल्या सुपरहिट ‘अजनबी’ (Ajnabee) चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यानंतर २००१ साली गोविंदा (Govinda) आणि मनीषा कोईराला (Manisha Koirala) ‘अचानक’ (Achanak) या सिनेमाची निर्मिती केली. त्यानंतर त्यांनी विद्युत जामवाल (Vidyut Jamwal) आणि श्रुति हसन (Shruti Haasan) यांच्यासोबत ‘द पावर (The Power) या सिनेमाची निर्मिती केली होती.
हेही वाचा :
- शाहिदच्या बहुचर्चित ‘जर्सी’ सिनेमाचे प्रदर्शन रद्द, कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे चित्रपटाच्या टीमचा निर्णय
- सलमान खानच्या ‘सुलतान’ चित्रपटासाठी ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती, खुद्द अभिनेत्यानेच केला खुलासा
- ट्विटरवर ‘अतरंगी रे’ विरोधात मोहीम, अक्षय-सारा अन् धनुषच्या चित्रपटावर ‘या’ गोष्टीला प्रोत्साहन दिल्याचा आरोप