Friday, April 19, 2024

ऋषी कपूरला रणबीरचे सिनेमे वाटायचे ‘बकवास’; म्हणायचे, ‘तू असे सिनेमे करतोस, ज्याने…’

रणबीर कपूरचे (Ranbir Kapoor) ‘शमशेरा’ आणि ‘ब्रह्मास्त्र’ हे दोन चित्रपट लवकरच रिलीझ होणार आहेत. दरम्यान, तो या चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये जोमाने व्यस्त आहे. एका पत्रकार परिषदेत रणबीर कपूरने सांगितले की, ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांना त्यांच्या चित्रपटांची निवड बकवास वाटायची. मात्र, ‘शमशेरा’ला साइन केल्यावर ऋषी खूप खूश होते. याचे कारण म्हणजे, त्यांनी दिग्दर्शक करण मल्होत्रासोबत ‘अग्निपथ’ या चित्रपटात काम केले होते. रणबीर म्हणाला की, त्याचे वडील आता जिथे आहेत, तिथे अभिमानाने हसत असतील.

हा चित्रपट साईन केल्याने खूश होते ऋषी
रणबीर कपूरला विचारण्यात आले की, ऋषी कपूर यांना ‘शमशेरा’चा काही भाग पाहिला होता का? यावर रणबीरने उत्तर दिले की, “त्यांनी करणसोबत ‘अग्निपथ’मध्ये काम केले होते. त्यांना या चित्रपटातून खूप प्रसिद्धी मिळाली आणि चित्रपटाच्या प्रभावामुळे ते खूप खूश होते. जेव्हा मी हा चित्रपट साइन केला, तेव्हा ते खूप आनंदी होते. कारण माझ्या चित्रपटांच्या निवडीबद्दल त्यांच्या खूप तक्रारी होत्या. (ranbir kapoor says his father calls his choice of movie is bakwas)

‘अभिमानाने हसत असतील’
रणबीर म्हणतो, ऋषी त्याला सांगायचे, तुझी चित्रपटाची निवड पूर्णपणे बकवास आहे. तू असे चित्रपट करतोय, जे लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. रणबीर म्हणाला, “दुर्दैवाने त्यांनी चित्रपटाचा ट्रेलर किंवा पोस्टर पाहिले नाही, पण कुठेतरी ते माझ्याकडे अभिमानाने पाहत असतील. ”

दुहेरी भुमिकेत आहे रणबीर
‘शमशेरा’ ही पिरियड फिल्म आहे. मात्र, रणबीरने असेही सांगितले आहे की, त्याच्या वडिलांनी त्याला पीरियड चित्रपट करण्यास मनाई केली होती. कारण त्या चालत नाहीत. तसेच, या चित्रपटात रणबीर दुहेरी भूमिका साकारत आहे. तो वडिलांच्या भूमिकेत आहे, ज्याचे नाव शमशेरा आहे. तर मुलगा बल्लीच्या भूमिकेतही तोच आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा