[rank_math_breadcrumb]

जेव्हा कित्येक दिवस घरी येत नसत ऋषी कपूर, रागाच्या भरात नीतू यांनी उचललं होतं ‘हे’ पाऊल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) आज आपल्यात नाहीय. पण ते आजही चाहत्यांच्या मनात आहेत. ऋषी कपूर यांनी त्यांच्या शेवटच्या चित्रपटाचे म्हणजेच ‘शर्माजी नमकीन’चे शूटिंग मध्येच सोडत निरोप घेतला. अशा परिस्थितीत वडिलांच्या शेवटच्या चित्रपटाचे प्रमोशन करताना अभिनेता रणबीर कपूरने (Ranbir Kapoor) ऋषी कपूर यांच्याशी संबंधित अशा काही आठवणी सांगितल्या, ज्या ऐकल्यानंतर प्रेक्षकांना पुन्हा एकदा ऋषी कपूरची आठवण झाली. ऋषी कपूर त्यांच्या कामाबद्दल किती गंभीर होते, हे तुम्हाला चांगलेच माहीत आहे. असाच एक किस्सा रणबीरने ऋषी कपूर यांच्या चाहत्यांशी शेअर केला.

वडील ऋषी यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करत असताना रणबीर कपूरने मीडियाला सांगितले होते की, त्याचे वडील कामामुळे खूप दिवस घरी येत नसत. ज्यामुळे आई नीतू कपूर (Neetu Kapoor) खूप रागावत असत. (ranbir kapoor speaks up on rishi kapoor never being home because of work)

कामाबाबत वडील ऋषीच्या या सवयीबद्दल बोलताना रणबीरने सांगितले की, “माझी आई खूप रागावायची, कारण ते कित्येक दिवस घरीच येत नसत. बाबा आईला चिंतेत टाकत असत. अशा परिस्थितीत माझी आई वडील ऋषी कपूर यांना रागाच्या भरात आरके स्टुडिओत पाठवत असे आणि त्यांना तिथे बसायला सांगायची.”

रणबीर कपूरने वडिलांशी संबंधित या आठवणी पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणल्या. ऋषी कपूरचे चाहते आजही त्यांना खूप मिस करताना दिसतात. त्यामुळे आजकाल नीतू कपूरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नीतू कपूर असे म्हणताना दिसत आहे की, कोणी ना कोणी त्यांना नेहमी ऋषी कपूर यांची आठवण करून देत असतं.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा