बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) पाचवा सीझन चांगलाच गाजताना दिसतोय. बाकीच्या सीझनपेक्षा हा सीझन नक्कीच वेगळा ठरताना दिसून येत आहे. बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा ‘लय भारी’ खेळ सुरू झाला आहे. नव्याचे नऊ दिवस संपलेत आणि एकमेकांच्या नाकीनऊ आणणं सुरू झालंय. काल भाऊचा धक्का पार पडला . यात रितेश देशमुख ने जान्हवी ची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे दिसून आले.
बिग बॉसचा दुसरा आठवडा जान्हवी च्या भांडणामुळे गाजताना दिसला. या आठवड्यात जान्हवी चे घरातल्या प्रत्येक सदस्यांसोबत भांडण होताना दिसून आले. तसेच, वर्ष उसगावकर सोबत झालेल्या वादामुळे तिच्यावर सोशल मीडिया वरून टीकेची झोड उठवली गेली. याचाच परिणाम म्हणून, रितेश देशमुखने जान्हवीची शाळा घेतली.
जान्हवी अभिजीत सावंतला
कार्यादरम्यान ‘बांगड्या घाल’ असे म्हणाली होती. यावरूनच रितेशने तिची शाळा घेतली. रितेश देशमुख म्हणाला कि ,” बांगड्या म्हणजे शक्तीच प्रतीक असत. यावरूयाच बांगड्या घालणाऱ्या स्त्रिया फक्त घर नाही तर देश सांभाळतात. बाकीच्यांना बाहेर काढेल की नाही माहिती नाही…पण तुम्हाला नक्की काढेल”. यानंतर, जान्हवी ला मात्र अश्रू अनावर झाले. जान्हवी सोबतच निकी व अरबाज ची सुद्धा शाळा घेतली .
दुसऱ्या आठवड्यात काही सदस्य चतुर म्हणून पुढे आले तर काही फितुर म्हणून, परंतु, कोण राईट आणि कोण वाईट हे भाऊच्या निर्णयावरून स्प्ष्ट झाले आहे. या आठवड्यच्या घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी निक्की तांबोळी, छोटा पुढारी म्हणजेच घनश्याम, योगिता चव्हाण , निखिल दामले, पंढरीनाथ कांबळे , सुरज चव्हाण हे सदस्य नॉमिनेट झाले आहेत. या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल हे पाहणे नक्कीच मनोरंजक असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
ॲक्शन सीक्वेन्ससाठी मी टॉम अँड जेरी कडून प्रेरणा घेतो ! अक्षयने केला गमतीदार खुलासा…
ऐश्वर्या आणि अभिषेक या व्यक्ती मुळे होणार वेगळे ? सोशल मिडीयावर वेगाने पसरतेय बातमी…