Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड पहिल्यांदा ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याची मूळ कॉपी ऐकून रडल्या होत्या लतादीदी; वाचा गाण्यामागील किस्से

पहिल्यांदा ‘ए मेरे वतन के लोगों’ गाण्याची मूळ कॉपी ऐकून रडल्या होत्या लतादीदी; वाचा गाण्यामागील किस्से

बॉलिवूड विश्वात आजपर्यंत अनेक देशभक्तीपर गीत आणि चित्रपट प्रदर्शित झाले आहे. देशावर बनलेले चित्रपट आणि गाणी पाहून नागरिकांच्या मनात देशाबद्दल प्रेम आणि आदर निर्माण होतो. देशावर बनलेल्या गाण्यांपैकी एक असलेले ‘ए मेरे वतन के लोगों’ या गाण्याला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम व प्रतिसाद मिळाला. पण तुम्हाला माहितीये का? या गाण्याला आपला आवाज देणाऱ्या लता मंगेशकर यांनी हे गाणे गाण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर आशा भोसले यांच्या नावाचा विचार झाला होता. पण कसंतरी या गाण्याचे गीतकार कवी प्रदीप यांनी लतादीदींना मनवले. मात्र, यावेळी गीत ऐकून लतादीदींनी एक अट घातली.

सिगारेट बॉक्सच्या ॲल्युमिनियम फॉइलवर लिहिले गाणे
‘ए मेरे वतन के लोगों’ (Aye Mere Watan Ke Logo) हे गाणे लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनी खूप भावनेने गायले आहे, हीच गोष्ट खूप खास आहे. कवी प्रदीप यांनी नंतर सांगितले की, मुंबईच्या माहीम बीचवर फिरत असताना हे शब्द त्यांच्या मनात आले, तेव्हा त्यांच्याकडे ना पेन होता ना कागद. त्यांनी जवळून जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीकडून पेन मागितला आणि सिगारेट पेटीच्या ॲल्युमिनियम फॉइलवर हे गीत लिहिले.

हेही वाचा – पहिल्यांदा ‘ए मेरे वतन के लोगों’ची मूळ कॉपी ऐकून रडल्या होत्या लतादीदी; वाचा गाण्यामागील किस्से

लता आणि संगीतकार यांच्यात झाला वाद
जेव्हा कवी प्रदीप यांनी गाणे तयार केले आणि लता मंगेशकर ते गाणार आणि संगीत सी रामचंद्र देणार हे निश्चित झाले. त्याचवेळी संगीतकार आणि गायक यांच्यात मतभेद झाले. त्यातून लता निघून गेल्या. त्यानंतर आशा भोसले यांना ते गाण्यास सांगितले, पण लता हे गाणार यावर प्रदीप ठाम होते. लता आपल्या आवाजात जी भावना आणि न्याय देऊ शकते, ती इतर कोणालाही जमणार नाही, असे त्यांना वाटले. त्यानंतर प्रदीप यांनी लतादीदींना मनवले.

पहिल्यांदा गाणे ऐकून रडल्या होत्या लतादीदी
लता मंगेशकर यांनी हे गाणे कवी प्रदीप यांच्याकडून ऐकले, तेव्हा ते ऐकून त्यांना रडू कोसळल्याचे सांगितले जाते. त्यांनी लगेचच ते गाण्यासाठी होकार दिला. त्यानंतर त्यांनी एकच अट घातली की, जेव्हा या गाण्याची रिहर्सल होईल, तेव्हा प्रदीप यांना स्वतः हजर राहावे लागेल. प्रदीप यांनी ही अट मान्य केली. त्यानंतर जे काही घडले त्याचा इतिहास झाला.

लता-आशा ड्यूएट गाणार होत्या, पण नंतर झाला वाद
मात्र, हे गाणे ऐकल्यानंतर लतादीदींनी ते सोलोऐवजी ड्यूटमध्ये गायले पाहिजे, असा सल्ला दिला. यातही त्यांच्यासोबत आशा सोबत असाव्या ही अपेक्षा होती. मात्र, लतादीदींनी ते एकट्यांनी गावे, अशी प्रदीप यांची इच्छा होती. या गाण्याचा सराव लता आणि आशा यांनी ड्यूएटमध्ये केला होता. परंतु जेव्हा आशा यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी त्यापासून दूर झाल्या. लतादीदींनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी काही ऐकलं नाही.

कार्यक्रमासाठी वृत्तपत्रांमध्ये लता आणि आशा या दोन्ही गायिकांचे नाव गायिका म्हणून आले होते. अशा परिस्थितीत महान संगीतकार आणि गायक हेमंत कुमार यांनी हा प्रोजेक्ट हाताळण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेही आशा यांना समजवू शकले नाहीत. त्यानंतर लतादीदींनी ते दिल्लीत एकट्यांनीच गायले.

नेहरू म्हणाले, ‘ज्याला हे गाणे जाणवू शकत नाही तो हिंदुस्थानी नाही’
नॅशनल स्टेडियममध्ये जेव्हा लतादीदींनी गाणे गायले, तेव्हा पंतप्रधान पंडित नेहरूंसह राष्ट्रपती राधाकृष्णन होते. नेहरूंच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. “जो या गाण्याने प्रेरित होऊ शकत नाही, तो हिंदुस्थानी नाही असे मला वाटते,” असेही ते म्हणाले होते.

हेही पाहा- कोणी पैश्यांसाठी तर कोणी प्रेमासाठी घेतला प्रसिद्ध अभिनेत्रींचा जीव

तेव्हा कवी प्रदीप झाले दुःखी
नॅशनल स्टेडियमच्या समारंभात २७ जानेवारी, १९६३ रोजी प्रदीप यांना निमंत्रण न मिळाल्याने ते दुःखी झाले. ज्यामध्ये लतादीदींनी गाणे गायले, तेव्हा संपूर्ण वातावरण भावुक झाले. मात्र, दोन महिन्यांनी शाळेच्या कार्यक्रमात नेहरू मुंबईत आले, तेव्हा कवी प्रदीप यांनी त्यांच्यासमोर हे गाणे नक्कीच गायले. त्या दिवशी प्रदीप यांनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहिलेले हे गाणे नेहरूंना सादर केले. या गाण्याने प्रदीप यांना देशातील इतर गीतकारांमध्ये उत्कृष्ट बनवले.

हेही वाचा-

हे देखील वाचा