बॉलिवूडमधल्या अशा अनेक जोड्या आहेत. ज्यांनी पडद्यावर अनेक रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. तसेच भूमिका साकारताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि अगदी विवाह बंधनात देखील अडकले आहेत. चला तर जाऊन घेऊयात बॉलिवूडमधल्या अश्याच काही जोडप्यांबद्दल.
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग
बॉलिवूड अभिनेत्री ‘दीपिका पादुकोण’ आणि ‘रणवीर सिंग’ यांनी आतापर्यंत 3 चित्रपट एकत्र केले आहेत. दोघांनी एकत्र केलेला पहिला चित्रपट म्हणजे ‘गोलियों की रासलीला: रामलीला’. या चित्रपटाच्या शूटिंगच्या दरम्यान ते दोघेही एकमेकांच्या जवळ आले. रणवीर आणि दीपिका हे दोघे जवळपास 6 वर्ष रिलेशनमध्ये होते. परंतु त्यांनी त्यांचं नावं सर्वत्र पसरू दिलं नाही. एकमेकांना चांगलं समजून घेतल्यावर दीपिका आणि रणवीरने लग्न करण्याचा निर्णय घेतला. आजही रणवीर दिग्दर्शक ‘संजय लीला भन्साळी’ यांचे आभार मानतो. तो असे म्हणतो की, संजय यांच्यामुळे मला दीपिका भेटली.
View this post on Instagram
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचं नावं देखील या यादीत येतं. यांच्या लव्ह स्टोरीबद्दल बोलायचे झाल्यास, एका जाहिरातीच्या शूटिंगच्या दरम्यान अनुष्का आणि विराट एकमेकांच्या जवळ आले. त्यानंतर त्यांची ओळख झाली. गप्पा वाढू लागल्या. हळूहळू दोघेही प्रेमाच्या जाळ्यात अडकले. हे दोघे बरेच वर्ष एकमेकांना डेट करत होते. मग पुढे जाऊन त्यांनी 2017 मध्ये लग्न केले. नुकतेच विराट आणि अनुष्का यांना मुलगी झाली आहे. त्यांनी तिचे नाव त्यांनी वामिका असं ठेवलं आहे. ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रक्षकांसोबत नेहमीच काही ना काही शेअर करत असतात.
View this post on Instagram
करीना कपूर खान आणि सैफ अली खान
अभिनेत्री करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांच्या लव्ह स्टोरीची सुरुवात एका चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान झाली. ‘टशन’ या चित्रपटात त्यांनी एकत्र काम केले. तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर त्यांनी ‘कुर्बान’ या चित्रपटात सोबत काम केले. 2012 मध्ये करीनाने तिच्या पेक्षा 10 वर्षांनी मोठ्या असणाऱ्या सैफ अली खानसोबत लग्न केले. या दोघांना तैमूर नावाचा एक मुलगा देखील आहे. तसेच करीना आणि सैफ हे लवकरच दुसऱ्यांदा आई- बाबा होणार आहेत, अशी बातमी देखील हाती आली आहे.
View this post on Instagram
काजोल आणि अजय देवगण
अभिनेत्री काजोल आणि अजय देवगण हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल आहे. 1995 मध्ये ‘हलचल’ या चित्रपटात दोघांनी पहिल्यांदा सोबत काम केले. त्यानंतर त्यांनी ‘इश्क’ या चित्रपटात एकत्र काम केले आणि तिथूनच त्यांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली. त्यांनी 1999 मध्ये लग्न केले. अजय आणि काजोल यांना दोन मुले आहेत. ज्यांची नावं नायसा आणि युग हे आहे.
View this post on Instagram
जेनेलिया डिसूझा आणि रितेश देशमुख
जेनेलिया आणि रितेश यांची प्रेम कहाणी खूप मजेशीर आहे. यांनी ‘तेरी मेरी कसम’ या चित्रपटात एकत्र काम केले. आणि तिथेच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. परंतु त्या दोघांनी कधीही सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाची कबुली दिली नाही. त्यांनी एका मुलाखतीमध्ये असे सांगितले की, ते फिरायला देखील कुठेतरी लांब जायचे. जेणेकरून त्यांना कोणी पाहू नये. पुढे जाऊन 2012 मध्ये रितेश आणि जेनेलिया यांनी लग्न केले.
View this post on Instagram
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
किसी का भाई किसी की जान सिनेमातील ‘नय्यो लगदा’ गाणे प्रदर्शित, सलमान आणि पूजाच्या रोमॅंटिक केमिस्ट्रीने वेधले लक्ष
पीएम माेदींनी साऊथ कलाकारांची घेतली भेट; म्हणाले, ‘महिलांच्या सहभागाला…’