हिंदी चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात तयार होणारी नाती काही काळच टिकतात असा आजपर्यंतचा अनुभव आहे. या क्षेत्रात प्रेम, घटस्फोट आणि ब्रेकअप या गोष्टी चालतच असतात. बॉलिवूडमधून रोजच अफेअरच्या, ब्रेकअपच्या बातम्या येत असतात. यामध्ये अनेक प्रेमप्रकरणे असे आहेत ज्यांची लवस्टोरी फार काळ टिकू शकली नाही, मात्र याला काही कलाकार अपवादही आहेत. हिंदी चित्रपट जगतातील अनेक अभिनेत्यांनी आपल्या बालपणीच्या मैत्रिणीसोबत, किंवा प्रेयसीसोबत लग्न करून खऱ्या प्रेमाचे उदाहरण जगासमोर ठेवले आहे. कोण आहेत हे प्रसिद्ध कपल्स चला जाणून घेऊ.
शाहरुख खान -गौरी खान :
हिंदी चित्रपट जगतातील प्रसिद्ध जोडी म्हणून अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खानचे नाव घेतले जाते. दोघांचेही लहानपणापासूनच एकमेकांवर प्रेम होते. त्यांची पहिल्यांदा भेट झाली तेव्हा शाहरुख खान १६ वर्षाचा आणि गौरी फक्त १४ वर्षाची होती. दोघांचा धर्म वेगळा असल्याने त्यांना लग्न करताना अनेक अडचणी आल्या मात्र तरीही त्यांनी आपले नाते टिकवत १९९१ मध्ये लग्नाची गाठ बांधली.