तब्बल ५० वर्षांहून अधिक काळ हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या दिग्गज अभिनेत्यांमध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि धर्मेंद्र (Dharmendra) यांचं नाव येतं म्हणजे येतंच. या दोन अभिनेत्यांनी रुपेरी पडदा चांगलाच गाजवला. कारण, या दिग्गजांचा अभिनयच असा होता की, तो प्रेक्षक यांचे सिनेमे पाहण्यासाठी लाईन लावायचे. आज इतक्या वर्षांनंतरही या दोन्ही कलाकारांच्या अभिनयात तीळमात्र बदल झालेला नाही. एकीकडे अमिताभ यांना महानायक म्हणून ओळखलं जातं, तर धर्मेंद्र हीमॅन या नावाने ओळखले जातात. या दोघांनीही आपल्या इतक्या मोठ्या करिअरमध्ये सिनेसृष्टीसाठी मौल्यवान योगदानही दिलंय.
या दोन्ही कलाकारांनी जे यश मिळवलंय, त्यासमोर कोणताही कलाकार फिका वाटेल. आजच्या काळात या दोन्ही कलाकारांचं नाव आदराने घेतलं जातं. पण सुरुवातीला या दोघांनाही चांगलाच घाम गाळावा लागलाय, हे विसरूनही चालणार नाही. अमिताभ यांच्यापूर्वी सिनेसृष्टीत धर्मेंद्र हे आले होते. अमिताभ यांच्या करिअरला भरारी देण्याचा प्रयत्नही धर्मेंद्र यांनी केलाय. त्यांच्यात खूप चांगलं बाँडिंग आहे. पण तुम्हाला माहितीये का, सिनेसृष्टी गाजवणारे हे कलाकार एका व्यक्तीला खूप घाबरायचे. कोण होते ते? चला जाणून घेऊया.
आपण बोलत आहोत. सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांच्याबद्दल. ऋषिकेश यांनी इंडस्ट्रीसाठी मोठं योगदान दिलं आहे. ३० सप्टेंबर, १९२२ रोजी कोलकातामध्ये जन्मले होते. कोलकाता युनिव्हर्सिटीतून त्यांनी रसायनशास्त्राची पदवी घेतली होती. शिक्षणात तर त्यांचा नादच नव्हता. शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते याच क्षेत्रात गणित आणि विज्ञात शिकवत राहिले. पण शिकवण्यापेक्षा त्यांना थिएटर आपल्याकडे खेचत होतं. आणि हेच मोठं कारण होतं. ते इंडस्ट्रीशी असे काही जोडले गेले की, त्यांनी आपली वेगळीच छाप सोडली. फिल्मफेअरच्या एका रिपोर्टनुसार, कोलकाताहून ऋषिकेश हे आपल्या करिअरची गाडी रुळावर आणण्यासाठी मुंबईला आले, पण सुरुवातीला त्यांनी पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी थिएटरमध्ये कॅमेरामनचं काम केलं. याचदरम्यान त्यांची भेट फिल्म एडिटर सुबोध मित्र यांच्याशी झाली.
सिनेमात जाण्याच्या मोहापायी त्यांनी सुबोध यांच्याकडून एडिटिंगचे धडे घेतले. यानंतर त्यांनी दिग्दर्शक विमल रॉय यांच्यासोबत काम करायला सुरुवात केली. त्यांनी तयार होत असलेल्या ‘दो बीघा जमीन’ आणि ‘देवदास’ या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. हे दोन्ही सिनेमे चांगलेच गाजले. या सिनेमानेच ऋषिकेश यांच्यासाठी कामाचे दरवाजे उघडले. असे म्हटले जाते की, यानंतर ऋषिकेश यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आनंद’, ‘गोलमाल’ यांसारख्या सुपरहिट सिनेमांनंतर ते चांगलेच लाईमलाईटमध्ये आले. त्यांच्या अनन्यसाधारण कामगिरीसाठी त्यांना १९९९ साली दादासाहेब फाळके पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं. इतकंच नाही, तर त्यांना भारत सरकारने देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘पद्मविभूषणा’नेही सन्मानित केलं होतं. विशेष म्हणजे त्यांना सेन्सॉर बोर्डाचे चेअरमन पदही मिळालं होतं.
ऋषिकेश यांची आणखी एक गोष्ट चांगलीच प्रसिद्ध होती. ते म्हणजे फिल्मी जगतात त्यांना शूटिंगपूर्वी सीन न सांगणाऱ्या आणि सुपरस्टार कलाकारांचं न ऐकणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये गणलं जातं. त्यांना अमिताभ बच्चन, जया बच्चन, धर्मेंद्र, अमोल पालेकर यांसारख्या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार बनवण्यासाठी ओळखलं जातं. तसेच त्यांना सुपरस्टार्समधील कलाकाराला बाहेर काढण्यासाठीही ओळखलं जातं. एका मुलाखतीत ऋषिकेश मुखर्जींच्या आठवणींना उजाळा देत धर्मेंद्र यांनी सांगितलं होतं की. ते आपल्या कामाप्रती खूपच कडक राहायचे. तसेच कोणालाही आपल्या कामामध्ये आडकाठी करू देत नव्हते. असंच काहीसं. १९७३ साली आलेल्या ‘चुपके चुपके’ या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान झालं होतं. एका सीनची शूटिंग होती. यात अभिनेते गोवर्धन असरानी ड्रायव्हरची भूमिका साकारत असल्याने ते ड्रायव्हरच्याच ड्रेसमध्ये राहायचे. पण त्यादिवशी सुटाबूटात उभे होते.
धर्मेंद्र जेव्हा सेटवर पोहोचले, तेव्हा त्यांना ड्रायव्हरचे कपडे घालायला दिले. यावर धर्मेंद्र यांनी असरानीला विचारले की, काय चाललंय? त्यावेळी तिथेच असलेले ऋषिकेश धर्मेंद्र यांना म्हणाले की, कहानीचं काम माझंय. तू ऍक्टिंगवर ध्यान दे. यापुढं धर्मेंद्र पुढं एकही शब्द बोलले नाही. असंच काहीसं अमिताभ बच्चन यांच्यासोबतही घडलं. असं म्हणलं जातं की, तिथं काही वेळातच अमिताभही पोहोचले. त्यांनीही हाच प्रश्न विचारला. त्यावेळी ऋषिकेश मुखर्जी खूपच चिडले. त्यांनी धर्मेंद्र यांना अमिताभ यांना समजवण्यास सांगितलं. त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं की, जर कहाणी तुम्हालाच माहिती असती, तर ते दिग्दर्शन करत नसते. यानंतर सांगितलं जातं की, धर्मेंद्र आणि अमिताभ काहीही न बोलता शांततेत आपल्या शॉटसाठी रेडी होतात.
आता तुम्हाला समजले असेल की, ऋषिकेश मुखर्जींपुढं हीमॅन धर्मेंद्र आणि अमिताभ यांचंही काय चालत नव्हतं. आणखी एक रंजक माहिती अशी की, धर्मेंद्र आणि अमिताभ यांच्यासारखंच बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्नांसोबत असंच काहीसं झालं होतं.
राजेश खन्नांच्या हिट सिनेमांपैकी एक असलेल्या १९७१ सालच्या ‘आनंद’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यानही असंच काहीसं घडलं होतं. या सिनेमात सर्वात आधी आनंद हे पात्र अमिताभ बच्चन यांना मिळणार होतं, तर बाबू मोशाय या भूमिकेत राजेश खन्ना दिसणार होते, पण राजेश खन्नांना समजलं की, सिनेमात आनंद हे पात्र वजनदार आहे. यामुळे ते आनंद हीच भूमिका साकारणार म्हणून अडून बसले, पण नंतर ऋषिकेश मुखर्जींना ही गोष्ट ऐकावीच लागली. जेव्हा अमिताभ यांना समजलं की, त्यांना न विचारता ऋषिकेश यांनी हा मोठा निर्णय घेतलाय, तेव्हा तेदेखील नाराज झाले, पण अमिताभ ऋषिकेश यांचा खूप आदर करायचे. त्यामुळे त्यांनी या सिनेमात काम करण्यास होकार दिला.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा