टेलीव्हिजनवरील सगळ्यांना हसायला लावणारा लोकप्रिय कार्यक्रम ‘तारक मेहता काल उल्टा चष्मा‘. हा खूप दिवसापासून चालत आलेला कार्यक्रम आहे आणि आजही या कार्यक्रमाचे जुने भाग प्रेक्षक आवडीने पाहत असतात. यामुळे या कार्यक्रमातील अशी काही पात्र आहेत जी प्रेक्षकांच्या मनात घर करुन बसली आहेत. गेल्या एक वर्षापासून यामधील अनेक पात्र बदलल्यामुळे नवीन भागाला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही, आणि आता पुन्हा एकदा महत्त्वाची भुमिका करणारे तारक मेहता याचेही पात्र दुसराच अभिनेता करत आहेत. त्यामुळे चाहत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. जाणून घेउया पूर्ण माहिती.
टेलिव्हिजनचा लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रम ‘तारक मेहता का उल्टा चष्मा'(Taarak Mehta ka Ooltah Chashmah) हा 14 वर्षापासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या कार्यक्रमातले कलाकार लोकांच्या मनात एवढे बसले आहेत की या कार्यक्रमाला आपले कुटुंब मानत आहेत. या कार्यक्रमाचे सगळेच कलाकार त्यांच्या भुमिकेत एवढे घुसले आहेत की, प्रेक्षक त्यांना त्यांच्या खऱ्या नावाने नाही तर भुमिकेतल्या नावानेच ओळखले जातात. कार्यक्रमाच्या या भुमिकेसोबतच आणखी एक भुमिका म्हणजे तारक मेहता उर्फ शैलेश लोढा(Shailesh Lodha) गेल्या 14 वर्षापासून प्रेक्षकाचे मनोरंजन करत आहेत. आधीच ते या कार्यक्रमातून गेल्यापासून सगळ्यांनी निराशा व्यक्त केली आहे. आता नवीन तारक मेहताची एंट्री झाल्याचे नवीन भागामध्ये दाखवत आहेत.
काही दिवसापूर्वी याही चर्चा समोर आल्या होत्या की, प्रसिद्ध अभिनेता सचिन श्राॅफ(Sachin Shroff) या कार्यक्रमामध्ये शैलेश लोढाच्या जागी घेणार आहेत. याविषयी निर्माता आणि अभिनेत्याने काहीच सांगितले नव्हते. मात्र, या कार्यक्रमाच्या निर्मात्याने प्रेक्षकांना खूप मोठी हिंट देत नवीन भागाच्या प्रोमोमध्ये नवीन तारक मेहताची एंट्री होताना एक झलक दाखवली आहे. पण प्रेक्षकांना नवीन तारक मेहता अजिबात आवडला नाही आणि त्यामुळे प्रेक्षक निर्मात्यावर संताप व्यक्त करत आहेत.
या कार्यक्रमाचा प्रोमो चाहत्यांच्या भेटीला आला आहे आणि लोक यावर जोरदार कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, “बंद करा तारक मेहता आणखी किती नवीन कालाकार येणार.” आणखी एकाने लिहिले, “एक काम करा सगळ्यांनाच बदलून टाका.”आणखी एकाने लिहिले, “म्हणजे कार्यक्रमाला बर्बादच करुन ठेवा, आता तर जुनेच भाग पाहावे लागणार आहेत. नवीन भागांना बघणे एक वर्षापूर्वीच सोडले आहेत.” अजून एक जनाने लिहिले की, “जुने तारक मेहता तुमची आठवण येेत आहे.” आणि एका चाहत्याने तर धमकीच देत कमेंट केली आहे की, “या कार्यक्रमात कितीही नवीन कलाकार येउ द्या मात्र, जेठालाल बदलला नाही पाहिजे.”
शैलेश लोढा आपल्या कामामुळे खुश नव्हते. माध्यमातील वृत्तानुसार, या कार्यक्रमामुळे त्यांना बाकीचे अनेक प्रसंगाला जाता येत नव्हते. या अभिनेत्याने कार्यक्रम सोडल्यानंतर अनेक कलाकार आणि निर्मात्यानी त्याला परत बोलवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, अभिनेत्याने आपला निर्णय बदलला नाही. गेल्या काही दिवसापासून या कार्यक्रमातील कलाकारांनी हा कार्यक्रम सोडला आहे. या यादीमध्ये मुख्य पात्र करणारी ‘दयाबेन’ अभिनेत्री दिशा वकानी आणि ‘अंजली भाभी’चे पात्र करणारी नेहा मेहता हे देखील सामील आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
‘ब्रह्मास्त्र’ सिनेमा हिट करायचा म्हणून सांगितले जातायेत चुकीचे आकडे? बजेटइतकी कमाई करणेही कठीण
‘लायगर’ फ्लॉप झाल्यावर विजय देवरकोंडाने पहिल्यांदाच केली सोशल मीडियावर पोस्ट, युजर्सने दिल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
कॅटरिना कैफ आणि विकी कौशलच्या नात्याबद्दल ‘हे’ काय बोलून गेला रणवीर सिंग, एकदा वाचाच