गेल्या महिन्यात समोर आलेल्या बातम्यांनुसार, या शोमधील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध पात्र म्हणजेच शैलेश लोढा (Shailesh Lodha) शो सोडत आहे. गेल्या १४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या शैलेशने आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. रिपोर्ट्सनुसार, खरं तर शोची टीम सतत शैलेशचे मन वळवण्याचा प्रयत्न करत आहे. खुद्द शोचे निर्मातेही त्यांना परत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. (tmkoc shailesh lodha stops receiving the calls from producers and co actors)
वृत्तांवर विश्वास ठेवला तर, निर्माते शैलेशचे मन वळवण्यासाठी शैलेशला सतत फोन करत आहेत. पण शैलेश लोढा त्यांच्या कॉलला उत्तर देत नाहीयेत. एवढेच नाही, तर असे म्हटले जात आहे की, शैलेशने केवळ निर्मात्यांचे कॉल घेणे थांबवले नाही. तर ते शोमधील त्यांच्या सहकलाकारांचे फोनही ते उचलत नाहीयेत. कारण ते देखील अभिनेत्याला शोमध्ये परत येण्यासाठी समजवण्याचा प्रयत्न करत होते. रिपोर्ट्सनुसार, शैलेश शोच्या नवीन कॉन्ट्रॅक्टवर नाखूष होते. त्यामुळे त्यांनी हा शो सोडण्याचा निर्णय घेतला.
रिपोर्ट्सनुसार, शैलेश गेल्या एक महिन्यापासून शोचे शूटिंग करत नाहीयेत. यामुळेच नुकत्याच प्रसारित झालेल्या एपिसोडमध्ये अभिनेता कुठेच दिसत नाही. जर शैलेश आपल्या निर्णयावर असेच ठाम राहिले, तर शोचे खूप नुकसान होऊ शकते. एखादी महत्त्वाची व्यक्तिरेखा शो सोडण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही अनेक महत्त्वाच्या पात्रांनी या शोला अलविदा केला आहे. या कलाकारांमध्ये दिशा वकानी (Disha Vakani), नेहा मेहता (Neha Mehta), गुरुचरण सिंग (Gurcharan Singh) यांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा