सध्या मराठी टेलिव्हिजनवरील ‘मन उडू उडू झाल’ मालिका प्रचंड लोकप्रिय ठरताना दिसत आहे.मालिकेची कथा आणि कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सध्या मालिकेमध्ये महत्वपुर्ण वळण प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. याचदरम्यान आता या मालिकेतील दोन कलाकार निरोप देणार असल्याची माहिती समोर आली आहे. मालिकेतील नयन म्हणजेच अभिनेता अमित परब आणि कस्तुरी सारंग यांनी या मालिकेचे शुटिंग पुर्ण करुन मालिकेला निरोप दिला असल्याची माहिती समोर आली आहे.काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
मन उडू उडू झाल ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय होताना दिसत आहे. मालिकेच्या कथेला घराघरात जोरदार प्रतिसाद मिळत असलेला पाहायला मिळत आहे. याचदरम्यान मालिकेत नयनच्या भूमिकेत असलेला अभिनेता अमित परबने नुकताच मालिकेला निरोप दिला आहे. मालिकेत अमितच्या नकारात्मक भूमिकेनेही प्रेक्षकांचे जोरदार मनोरंजन केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. अनेकवेळी त्याच्या भूमिकेसाठी त्याला प्रेक्षकांचा रोशही पत्करावा लागला. आता लवकरच नयनराव मालिकेतून निरोप घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
View this post on Instagram
अमित परबने एमबीएचे शिक्षण पुर्ण करुन नोकरी सांभाळत सांभाळत या मालिकेत काम केले होते. त्यामुळे त्याच्यासाठी ही मालिका खूपच महत्वाची महत्वाची होती. या मालिकेला निरोप देणार असल्याने अमितने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्टही शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने “आज मी मालिकेचा शेवटचा एपिसोड शूट करत आहे. अत्यंत जड अंतकरणाने २०० एपिसोडच्या नंतर माझ्यावर निरोप घेण्याची वेळ आली आहे. मला यावेळी काय बोलू समजत नाही,पण मला प्रत्येकाचे आभार मानायचे आहेत. मला इतके भरभरुन प्रेम दिल्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे,” अशा भावूक शब्दात अभिनेत्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
- हेही वाचा –
- Bigg Boss Malayalam | दिलिशा प्रसन्न बनली शोच्या सीझन ४ची विजेती, पहिल्यांदाच एका महिलेने जिंकली ट्रॉफी
- हातात सिगारेट घेतलेल्या ‘माँ काली’च्या पोस्टरने उडवली खळबळ, चित्रपट निर्मातीच्या अटकेच्या मागणीने धरला जोर
- ‘आरआरआर चित्रपट म्हणजे गे लवस्टोरी…’ ऑस्कर विजेत्या कलाकाराने केले धक्कादायक वक्तव्य, नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप