या शोमध्ये आलेले अनेक कलाकार अनेकदा त्यांच्या बोलण्यामुळे आणि खुलाशांमुळे वादात सापडतात. असेच काहीसे शाहरुख खानसोबत घडले, जेव्हा तो करणच्या शोमध्ये पाहुणा म्हणून दिसला होता. खरं तर, शो दरम्यान शाहरुखने सलमान खानबद्दल अशी कमेंट केली होती, ज्यामुळे सलमान संतापला होता. ‘कॉफी विथ करण’च्या तिसऱ्या सीझनच्या नवव्या एपिसोडमध्ये शाहरुख खान करण जोहरचा पाहुणा म्हणून आला होता. यादरम्यान, त्याने २००८मधील कॅटरिना कैफच्या (Katrina Kaif) वाढदिवसाच्या पार्टीशी संबंधित एक किस्सा सांगितला. (when shah rukh apologized to salman khan)
खरंतर, या बर्थडे पार्टीदरम्यान शाहरुख खान आणि सलमान खानमध्ये कशावरून तरी भांडण झालं होतं. या पार्टीनंतर दोघांमध्ये शीतयुद्धही सुरू झालं. अनेक बातम्यांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दोघांमधील भांडण इतके वाढले होते की, हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले होते. शोमध्ये या वाक्याबद्दल बोलताना शाहरुख म्हणाला होता की, त्याच्या आयुष्यात ज्या काही गोष्टी त्याच्यावर ओझे बनतात, त्यापासून दूर राहून त्याला शांततेत जगायचे आहे.
यादरम्यान तो सलमान खान आणि आमिर खानसोबतच्या (Aamir Khan) त्याच्या वादांबद्दलही बोलला. तसेच फराह खानसोबतच्या (Farah Khan) मतभेदांचाही उल्लेख केला. दरम्यान, शाहरुखने सलमान खानची जाहीर माफीही मागितली होती, मात्र शाहरुखने अशी जाहीर माफी मागणे सलमानला आवडले नाही. अशा परिस्थितीत शाहरुखच्या माफीनाम्यावर प्रतिक्रिया देताना सलमानने सांगितले होते की, त्याच्या या वागण्यावर तो संतापला आहे. शाहरुखला माफी मागायची असेल, तर त्याच्याशी थेट बोलायला हवे होते, असे सलमानने म्हटले होते.
यानंतर दोघांमधील हे शीतयुद्ध २०१४ पर्यंत असेच सुरू राहिले. पण शेवटी दोन्ही कलाकारांनी आपापल्या तक्रारी विसरल्या आणि बाबा सिद्दिकीच्या इफ्तार पार्टीला हजेरी लावली. याठिकाणी दोघांनी एकमेकांशी केवळ हस्तांदोलनच केले नाही तर मिठी मारली आणि जुन्या सर्व गोष्टी विसरल्या. सध्या या दोन्ही कलाकारांमध्ये चांगली मैत्री आहे. दोघांमधील संबंध खूप सुधारले आहेत. कदाचित यामुळेच शाहरुख लवकरच सलमान खानच्या आगामी ‘टायगर ३’ या चित्रपटात कॅमिओ करताना दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा