Monday, July 1, 2024

करिश्मासोबत नाते तोडून अभिषेकने का केले तीन वर्षांनी मोठी असणाऱ्या ऐश्वर्यासोबत लग्न? कारण ऐकून व्हाल हैराण

बॉलिवूडमधील खास जोड्यांपैकीच एक अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय आहेत. सर्वत्र त्यांच्या नात्यांचे गुणगान गायले जाते. ऐश्वर्या राय सुंदरतेबरोबरच सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. त्याचवेळी अभिषेक एक फ्लॉप अभिनेता आहे. असे असून सुद्धा या गोष्टीमुळे दोघांच्या प्रेमात कधीच दुरावा आला नाही. ही गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे, की ऐश्वर्या अभिषेकपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. मात्र तरीही अभिषेकने आपल्या पेक्षा तीन वर्षांनी मोठ्या असणाऱ्या ऐश्वर्या राय सोबत लग्न का केले? अभिषेकला जेव्हा या विषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा त्याने यामागचे रहस्य सांगत मोठा खुलासा केला होता.

अभिषेकने एका मुलाखतीत आपल्या लग्नाविषयी बोलताना सांगितले की, “मी माझ्यापेक्षा मोठ्या असणाऱ्या ऐश्वर्याचे सौंदर्य पाहून तिच्याशी लग्न केले नाही. तर ती दिसायला जितकी सुंदर आहे, तितकीच मनाने सुद्धा सुंदर आहे. ती खूप उत्कृष्ट व्यक्ती आहे. अभिषेकने हे सुध्दा सांगितले की, मी त्या ऐश्वर्यासोबत लग्न केले आहे, जी घरात मेकअप न करता असते. (why abhishek bachchan married aishwarya rai)

ऐश्वर्याच्या आधी करिश्मासोबत लग्न करणार होता अभिषेक बच्चन
ऐश्वर्याच्या आधी अभिषेक करिश्मा कपूरसोबत नात्यात होत. इतकंच नाही, तर त्या दोघांचा साखरपुडा सुद्धा झाला होता. दोघांमधील जवळीकता मीडियासाठी चर्चेचा विषय झाली होती. पण एकवेळ अशी आली की, दोघांमधील नातं संपुष्टात आलं. त्यांचा साखरपुडा देखील मोडला. करिश्माने एका मुलाखतीत सांगितले होते की, तिला अभिषेकसारखा चांगला व्यक्ती आणि बच्चन कुटुंबासारखे चांगले कुटुंब कधीच मिळणार नाही. साखरपुडा मोडल्यानंतर काकी नीतु कपूरला विचारले असता, त्यांनी या बाबतीत बोलण्यास नकार दिला.

अभिषेकमुळेच मोडला होता साखरपुडा
साखरपुडा मोडण्याचे सगळ्यात मोठे कारण जया बच्चन होत्या, असे सांगितले जाते. कारण जया यांना करिश्मा कदाचित आवडत नव्हती. एका मुलाखतीमध्ये जया बच्चन यांनी सांगितले होते की, साखरपुडा मोडण्याचे कारण अभिषेक स्वतः आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, करिश्माला लग्नानंतर बच्चन कुटुंबियांपासून वेगळं राहायचं होत. पण अभिषेकला ही गोष्ट मान्य नव्हती. यामुळेच अभिषेक-करिश्मा यांच्या नात्यामध्ये दुरावा आला आणि अभिषेकला करिश्मा सोबत साखरपुडा मोडावा लागला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मला शिव्या देणे सोपे आहे, कारण मी एकटीच आहे, पण…’, अश्लील कंटेंट प्रकरणात गेहना वशिष्ठचे विधान

-करण जोहरला खूप सतावते मुलं यश- रुही यांच्याबद्दल ‘ही’ भीती; मुलाखतीत स्वत: केले उघड

-जेव्हा विद्या बालनला भिकारी समजून एका व्यक्तीने हातात ठेवले सुट्टे पैसे; काही काम धाम करण्याचाही दिला होता सल्ला

हे देखील वाचा