Monday, July 1, 2024

प्राण यांच्यासोबत रात्रभर हॉटेलमध्ये राहण्याची आलेली वेळ, बरं-वाईट होण्याच्या भीतीने थरथर कापत होती अभिनेत्री

हिंदी चित्रपट जगतात असे अनेक खलनायक होऊन गेले, ज्यांनी आपल्या अभिनयाने खलनायकाच्या भूमिकेत इतका जिवंतपणा आणला होता की, त्यांना खऱ्या आयुष्यातसुद्धा लोक घाबरत होते. या खलनायकाच्या भूमिकेत सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरले ते दिवंगत अभिनेते प्राण. असे म्हणतात की, त्या काळात प्राण साहेबांचे नाव ऐकल, तरी लोक भीतीने कापायचे. ते जेव्हा शूटिंग करायचे, तेव्हा लोकांच्या मनात त्यांची तीच चित्रपटातील खलनायकाची भूमिका असायची. ज्यामुळे लोक त्यांच्यापासून दूरच राहत असत. प्राण त्यांच्या भूमिका इतक्या जीव ओतून करायचे की, पाहणार्‍याला ते स्वतः असेच आहेत, असा समज व्हायचा.

प्राण यांची मंगळवारी (दि. १२ जुलै) पुण्यतिथी साजरी केली जाते. यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांना अभिनेत्री का घाबरायच्या.

म्हणूनच प्राण यांच्यासोबत काम करणार्‍या अभिनेत्री सुद्धा त्यांना घाबरत असत. ‘ड्रीमगर्ल’ हेमा मालिनी यांनी प्राण यांच्यासोबत अनेक चित्रपटात काम केले आहे. हेमा मालिनीसुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र, त्यासुद्धा प्राण यांना घाबरत असत. शूटिंगदरम्यान प्राण जेव्हा त्यांच्याकडे बघत, तेव्हा त्यांचा भीतीने थरकाप उडत असे. याबाबत खुद्द हेमा मालिनी यांनी एका कार्यक्रमात खुलासा केला होता.

एका कार्यक्रमात बोलताना हेमा मालिनी यांनी यासंबंधी खुला होता. त्यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, “प्राण साहेबांसोबत काम करताना प्रचंड भिती वाटते, या भीतीच कारण ते एक खलनायक आहेत.”

प्राण यांना घाबरणाऱ्या हेमा मालिनी एकट्या अभिनेत्री नाहीत, तर अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांना प्राण साहेबांची भीती वाटायची. त्यामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री अरुणा इराणी यांचा सुद्धा समावेश आहे. खुद्द अरुणा यांनी याबद्दलचा एक किस्सा एका मोठ्या वृत्तपत्राशी बोलताना सांगितला होता. यावेळी त्या म्हणाल्या होत्या की, “प्राण साहेबांबद्दल मी माझ्या मनामध्ये चुकीची प्रतिमा तयार केली होती.”

याबद्दल एक प्रसंग सांगताना त्यांनी सांगितले होते की, “प्राण साहेबांबद्दल माझ्या मनात खूप गैरसमज तयार झाले होते. त्यामुळे त्यांची खूप भीती वाटायची. एकदा प्राण साहेबांसोबत रात्रभर हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आली होती. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मला भीती वाटत होती की, ते माझ्यासोबत काही गैरवर्तन तर करणार नाहीत ना.” याबद्दल बोलताना अरुणा इराणी म्हणाल्या होत्या की, “त्या रात्री त्यांनी माझी छोट्या बहिणीसारखी काळजी घेतली. ज्यामुळे त्यांच्याबद्दल झालेले गैरसमज दूर झाले.”

लोकांच्या मनात असलेली भीती खुद्द प्राण यांनासुद्धा माहिती होती. त्यांना सुद्धा माहिती होते की, “लोक आपल्याला घाबरतात.” याबद्दल बोलताना प्राण यांनी एक प्रसंग सांगितला, “ज्यावेळी मी माझ्या मित्राला भेटायला गेलो होतो. मित्राच्या घरी गेल्यानंतर मित्राने माझी त्याच्या बहिणीशी ओळख करून दिली. मात्र, त्यावेळी मित्राची बहीण तिथून रागाने निघून गेली. या भेटीनंतर त्या मित्राने फोन करून मला सांगितले की, माझ्या बहिणीने मला विचारले की, ‘कुठल्या गुंडाना घरी घेऊन येत असतोस.'”

प्राण यांची लोकप्रियता इतकी होती की, त्या काळात ते अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा जास्त मानधन घेत होते. प्रेक्षकसुद्धा त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

गंमती गंमतीत झाले वांदे! प्राण यांनी अभिनेत्रीला अचानक खेचलेले पाण्यात, घाबरून तिनेही उचललेलं मोठं पाऊल

प्रेम! संजीव कुमारांच्या प्रेमात आकंठ बुडालेली ‘ही’ अभिनेत्री, अभिनेत्याचे निधन होताच गेली होती नैराश्यात

Brahmastra | चित्रपटाला का लागली ५ वर्षे? अखेर मौन तोडत रणबीर कपूरने केला खुलासा

हे देखील वाचा