Wednesday, June 25, 2025
Home बॉलीवूड ‘कभी खुशी कभी गम’सारखा चित्रपट आज बनवणं अशक्य’, असं का म्हणतोय करण जोहर?

‘कभी खुशी कभी गम’सारखा चित्रपट आज बनवणं अशक्य’, असं का म्हणतोय करण जोहर?

‘कभी खुशी कभी गम’सारखा चित्रपट आजच्या काळात बनवता येणार नाही, असे चित्रपट निर्माता करण जोहरला (Karan Johar) वाटते. एवढा मोठा मल्टीस्टारर चित्रपट आता का बनू शकत नाही, याचे कारणही त्याने स्पष्ट केले आहे. करण जोहर रोपोसोवरील लाइव्ह शो दरम्यान करीना कपूर (Kareena Kapoor), अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), ऋतिक रोशन (Hrithik Roshan), काजोल (Kajol), शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि जया बच्चन (Jaya Bachchan) यांच्या ब्लॉकबास्टरबद्दल बोलला.

‘माय मूव्ही लाइफ’ लाइव्ह शो दरम्यान, करणने अनेक अभिनेते, चित्रपट आणि त्याच्या भूतकाळातील हिट चित्रपटांबद्दल सांगितले. ‘कभी खुशी कभी गम’बद्दल बोलताना करण जोहरने भारतीय चित्रपट उद्योग कसा बदलला आहे, हे उघड केले आणि म्हणाला, शाहरुख खान, काजोल, करीना, ऋतिक, जया आणि अमिताभ सारखी स्टार कास्ट असणे आता शक्य नाही. (no one can afford movies like kabhi khushi kabhie gham nowadays)

तो पुढे म्हणाला, “आज कोणीही ‘कभी खुशी कभी गम’ सारखा चित्रपट विकत घेऊ शकत नाही. एका अभिनेत्याला एका फ्रेममध्ये बसवणे इतके महागडे झाले आहे. त्यात ६ची कल्पना कशी करायची? ही खेदाची गोष्ट आहे, कारण प्रेक्षकांसाठी एका फ्रेममध्ये इतके कलाकार पाहणे पर्वणी असते. मी आशा करतो, इच्छा करतो आणि प्रार्थना करतो की असे घडावे.”

करण जोहर शेवटी म्हणाला, “आता आर्थिकदृष्ट्या अवघड आहे, पण आपण मल्टी-स्टार परत घेतले पाहिजे, कारण एकाच्या किमतीत प्रेक्षक जास्त मिळते.” करण जोहर एक प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. पण आजकाल करण त्याच्या ‘कॉफी विथ करण सीझन ७’ शोमुळे चर्चेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा