गाेविंदाने बाॅलिवूडमध्ये जवळपास 2 दशक आपला जलाव दाखवला. कॉमेडी, ऍक्शनपासून रोमान्स आणि डान्सपर्यंत गोविंदाचा दबदबा राहिला. इंडस्ट्रीला 30 वर्षांहून अधिक काळ देणाऱ्या गोविंदाने आपलं करिअर घडवण्यासाठी खूप संघर्ष केला. अभिनेता आणि निर्मात्याच्या वडिलांचा मुलगा असूनही, गोविंदाला अभिनेता बनण्यासाठी सुरवातीपासून खूप परिश्रम घ्यावे लागले.आपल्या मेहनती आणि प्रतिभेच्या जोरावर गोविंदाने प्रसिद्धीमध्ये विशेष स्थान मिळवले. गोविंदाचे वडील अरुण कुमार आहुजा हे देखील बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता होते. एक काळ असा होता की, गोविंदाचा जन्म होताच अरुण आहुजा नाराज झाले होता. इतकंच नाही तर अरुण आहुजाने गोविंदाला मुलगा म्हणून स्वीकारलंही नाही. अरुण आहुजा यांनी गाेविंदा जन्माला आल्यानंतर त्याला अनेक वर्ष जवळ घेतले नाही. अरुण आहुजाच्या गोविंदाबद्दलच्या नाराजीमागे एक मजेशीर कारण आहे. काय आहे ते कारण? चला जाणून घेऊया…
गोविंदाची आई निर्मला देवी देखील अभिनेत्री होत्या. लग्नापूर्वी निर्मला देवी मुस्लीम कुटुंबातील होत्या आणि त्यांचे नाव नाझीम असे होते. लग्नानंतर नाझिमने धर्म बदलून निर्मला असे नाव ठेवले. निर्मला देवी गर्भवती होताच त्यांनी साध्वी बनण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी गोविंदा आईच्या पोटात होता.
गोविंदाच्या जन्मानंतर त्याच्या आईने वडिलांशी कधीही संबंध ठेवला नाही. गोविंदाने अनेक मुलाखतींमध्ये खुलासा केला आहे की, ‘माझी आई माझ्या वडिलांसोबत राहायची, पण त्यांचे त्यांच्याशी कोणतेही संबंध ठेवले नाहीत.’ निर्मला देवींच्या या निर्णयाचे कारण अरुण यांनी गाेविंदाला मानले. गोविंदामुळेच निर्मला देवी साध्वी झाल्या असे त्यांना वाटायचे.
गोविंदाच्या वडिलांनी त्याला वर्षानुवर्षे जवळ घेतले नाही. मात्र, नंतर दोघांमधील मतभेद मिटले आणि खूप प्रेम निर्माण झाले. गोविंदाचे वडील अभिनेत्यासोबत निर्माता होते. मात्र, नंतर त्यांना चित्रपटांमध्ये तोटा सहन करावा लागला आणि त्यांना आपला बंगला विकून दुसरीकडे जावे लागले. त्यामुळे आर्थिक तंगीमुळे संपुर्ण कुटुंबाला संघर्ष करावा लागला.(bollywood actor govinda father arun kumar ahuja refused to accept him as son mother nirmala devi turned into sadhu after getting pregnant true story)
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
एकता कपूर लवकरच तिच्या खास अंदाजमध्ये करणार ‘या’ सुपरहिट चित्रपटाच्या सिक्वलची घोषणा?
‘भोला’नंतर पुन्हा ‘या’ सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर दिसणार अजय आणि तब्बूची सुपरहिट जोडी