Tuesday, June 24, 2025
Home बॉलीवूड जेव्हा सुमन कल्यामपुर यांच्याकडून हिसकावण्यात आलं ‘ऐ मेरे वतन के लोगों’, वाचा काय आहे कारण

जेव्हा सुमन कल्यामपुर यांच्याकडून हिसकावण्यात आलं ‘ऐ मेरे वतन के लोगों’, वाचा काय आहे कारण

प्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी आपल्या सुरेल आवाजाने अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. यामध्ये ‘ना तुम जानो ना हम’, ‘दिल गम से जल रहा है’, ‘मेरे मेहबूब ना जा’, ‘जो हम पे गुजराती है’, ‘बेहना ने भाई की कलाई में’ या गाण्यांचा समावेश आहे. सुमन कल्याणपूर यांचा आवाज लता मंगेशकर यांच्यासारखाच आहे. काहीवेळा त्यांच्या चाहत्यांनाही दोन आवाजांमध्ये फरक करणे कठीण जाते. विशेष म्हणजे, लता मंगेशकर यांनी गायलेले ‘ये मेरे वतन के लोगों‘ हे गाणं पहिले सुमन कल्याणपूर यांनी गायले होते. याचा खुलासा स्वतः गायिकेने केला आहे.

सुमन कल्याणपूर (suman kalyanpur) यांचा जन्म 28 जानेवारी 1937 रोजी ढाका येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शंकर बाबू असे हाेते. शंकर बाबूंना पाच मुले होती. मुलांना चांगले शिक्षण देण्याचे स्वप्न घेऊन शंकर बाबू 1943 मध्ये कुटुंबासह मुंबईत आले. सुमन यांना लहानपणापासूनच चित्रकला आणि संगीतामध्ये ओढ होती. त्यांनी कला शाखेत पदवीही पूर्ण केली. सुमनला चित्रकार व्हायचे होते, पण तिच्या वडिलांचे मित्र पंडित केशव राव यांना तिच्या मधुर आवाजाची गोडी लागली. त्यांनी सुमनच्या वडिलांना सुमनला संगीत शिकवायला सांगितले. अशातच सुमनने संगीताचा सराव सुरू केला.

सुमन कल्याणपूर या सुरुवातीला हौशी म्हणून संगीत शिकत होत्या, पण कालांतराने त्यांची आवड वाढू लागली. सुमनने त्यांचे गुरू यशवंत देव यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. त्यांनीच तिला ‘शुक्राची चांदणी’ या मराठी चित्रपटात पहिल्यांदा गाण्याची संधी दिली. मात्र, ते गाणं चित्रपटात येऊ शकले नाही. त्यानंतर संगीतकार मोहम्मद शफी यांनी सुमनला ‘मंगू’  चित्रपटात गाण्याची संधी दिली. त्यावेळी सुमन फक्त 17 वर्षाच्या हाेत्या. मात्र, त्यावेळीही चित्रपटात सुमनचे केवळ एकच गाणे ठेवण्यात आले ते म्हणजे, ‘कोई पुकारे धीरे से तुझे’ हे हाेते. त्याच वर्षी सुमनला संगीतकार नौशाद यांच्या दिग्दर्शनाखालील ‘दरवाजा’ चित्रपटात पाच गाणी गाण्याची संधी मिळाली, त्यानंतर सुमन यांनी इंडस्ट्रीत आपले पाय घट्ट रोवले. मात्र, ‘ओ मेरे वतन के लोगों’ हे गाणं गाता येत नसल्याची खंत त्यांना अजूनही आहे.

एकदा एका संवादादरम्यान सुमन कल्याणपूर यांनीच ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्याबाबत मोठा खुलासा केला होता. त्यांनी सांगितले की, “मला पंडित जवाहरलाल नेहरूंसमोर हे गाणं गाण्यासाठी बोलावण्यात आले होते, रिहर्सलही करण्यात आली होती, पण मी स्टेजवर पोहोचताच मला या गाण्याऐवजी दुसरे गाणं गाण्यास सांगण्यात आले. हे गाणं माझ्याकडून का हिसकावले गेले हे अद्याप मल कळले नाही. पंडित नेहरूंसमोर ‘ए मेरे वतन के लोगो’ गाण्याची संधी मिळाली तेव्हा माझ्या आनंदाला थारा नव्हता, पण कार्यक्रमादरम्यान गाणे गाण्यासाठी मी स्टेजजवळ पोहोचल्यावर मला थांबवण्यात आले आणि या गाण्याऐवजी दुसरे गाणे गाण्यास सांगितले. हे गाणं माझ्याकडून हिरावले गेले, हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. ती गोष्ट आजही मला डळमळते.”

सुमन कल्याणपूर यांना नुकतेच कला क्षेत्रातील योगदानाबद्दल पद्म पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.(singer suman kalyanpur birthday know about singer life career popular songs and unknown facts)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
देवदूत सोनू सूदला चाहत्यकडून ही अनाेखी भेट; अभिनेता म्हणाला, ‘माझ्याकडे शब्द नाहीत…’

याला काय अर्थ! केएल राहुल आणि अथियाच्या लग्नाला मिळणाऱ्या भेटवस्तू फक्त अफवाच, मोठा खुलासा

हे देखील वाचा