अभिनेते मिलिंद गवळी हे मागील अनेक वर्षांपासून मराठी मनोरंजनविश्वात सक्रिय आहेत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक उत्तम चित्रपटांमध्ये काम केले. सध्या टेलिव्हिजन विश्वात गाजणाऱ्या, ‘आई कुठे काय करते?’ या मालिकेने त्यांना एक वेगळीच प्रसिद्धी आणि ओळख मिळवून दिली आहे. मिलिंद गवळी हे अनेक वर्षांपासून काम करत असल्याने त्यांनी अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये नाटकांमध्ये काम केले. त्यामुळे त्यांच्याकडे अगणित अनुभव आणि किस्से आहेत. या किस्से, अनुभव किंवा त्यांना वाटणाऱ्या काही गोष्टी, मतं ते आता सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त करत असतात. मुख्य म्हणजे त्यांच्या पोस्ट, त्याचे किस्से सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असतात.
View this post on Instagram
आता नुकतीच मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी रडण्याबद्दल त्यांच्या आयुष्यातील एक किस्सा सांगत रडण्याचे महत्व आणि रडले नाहीतर काय होते याबद्दल त्यांचे मत व्यक्त केले आहे. मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “रडावसं वाटलं तर माणसाने रडावं मन मोकळं करावं असंख्य गोष्टी मनाविरुद्ध घडत असतात ,मनाला दुखावणाऱ्या गोष्टी आपल्या आजूबाजूला सतत घडत असतात ,आपल्या मनाला त्याचा त्रास होत असतो आणि ते सतत चालू असतं. आणि खूप आतल्या आत आपण साठवून ठेवत असतो, मग अचानक बांध फुटतो आणि आपण उपसाभक्षी ढसाढसा रडायला लागतो आणि मग रडून झालं की मन शांत होत , आपल्याला बरं वाटतं पूर्वीच्या काळी कुणी गेलं आणि जर त्याचा जवळचा व्यक्ती रडत नसेल तर त्याला जबरदस्ती रडायला लावायचे, कित्येक वेळा माझ्या कानावर ते शब्द पडलेले आहेत , “मोकळी हो बाई मोकळी हो रड.” एकदा producer कैं. अण्णासाहेब देशपांडे यांना मी म्हणालो होतो “का आपण रडके पिक्चर्स करायचे, का ओडियन्सला आपण रडवायचं, “
मिलिंद गवळी यांच्या प्रश्नाचे उत्तर देताना निर्मात्यांनी काय सांगितले याबद्दल त्यांनी लिहिले, “त्यांनी मला सांगितलं होतं की, गावा खेड्यातल्या बायका आयुष्यामध्ये खूप सोसतात खूप सहन करतात, सिनेमाच्या माध्यमातून त्या मोकळ्या होतात, त्यांचं मन शांत होतं, आमच्या प्रोडूसर कैं. वासवानीने “सुन लाडकी सासरची ” चित्रपटांमध्ये बायकांना हात रुमाल वाटले होते, त्यांना इतकी खात्री होती की सिनेमा बघताना बायका भरभरून रडणार. सिनेमात काम करताना आम्हाला बरेच वेळेला रडायचे प्रसंग येतात, आम्हचं काम करत असताना मन मोकळं होतं, सामान्य माणसाचं काय होत असेल, काहींना तर रडायची अजिबात सवयच नसते, च्या धकाधकीच्या जीवनामध्ये सगळं मनामध्ये साठवून राहत असेल का? टॉक्सिक Toxic होत असेल का? Stressful होत असेल का? म्हणून लोक आजारी पडत असतील का? महत्त्वाचं म्हणजे जो माणूस रडतो, ज्याच्या डोळ्यातून अश्रू येतात, तो संवेदनशील तर असतोच पण तोच खरं आयुष्य जगतो असं मला वाटतं….”.
दरम्यान मराठीसोबतच मिलिंद यांनी हिंदी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी परिवर्तन, आहट आणि बीपी सिंग दिग्दर्शित सीआयडी, बालाजी टेलिफिल्मच्या एकापाठोपाठ एक मालिका बंधन, इतिहास, कहानी तेरी मेरी, सोबतच त्यांनी निलांबरी, आई, मराठा बटालियन आदी मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नवऱ्यालाच शिकव म्हणजे झालं….,’ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा सून शिवानी रांगोळे हिला मजेशीर सल्ला
2 वर्षात 100 ट्यून बनवल्या, पण 9 च सिलेक्ट झाल्या; चित्रपटातील गाणी आणि नृत्याने रचला इतिहास