Monday, June 23, 2025
Home मराठी “अहंकार त्यांना करू देत नाही…” मिलिंद गवळी यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

“अहंकार त्यांना करू देत नाही…” मिलिंद गवळी यांनी शेअर केलेली ‘ती’ पोस्ट आली चर्चेत

मालिका नेहमीच बरीच लोकांना रटाळवाण्या वाटतात. नक्कीच काही दिवसांनी , महिन्यांनी मालिका भरकतात आणि दिशाहीन होत सुरु असतात. मात्र काही मालिकांमध्ये ड्रामा असला तरी त्यातून काही चांगले देखील सांगण्याचा प्रयत्न केला जातो. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर स्त्रीला तिचे निर्णय घेण्याचा आणि लग्न करण्याचा अधिकार आहे, हे आता चालू असलेल्या आई कुठे काय करते या मालिकेतून दाखवले जात आहे. मात्र सिरीयल म्हटले की, अतिशयोक्ती, कट कारस्थानं काहीतरी असणारच. मालिकेत अनिरुद्ध हे पात्र खूपच विचित्र झाले आहे. अर्थात ती मालिकेची आणि कथेची गरज आहे. आपल्या पहिल्या बायकोचे दुसरे लग्न पाहून अनिरुद्धच्या खूप संताप होत आहे. यावरूनच अनिरुद्ध ही भूमिका साकारणाऱ्या मिलिंद गवळी यांनी एक मस्त पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ““काय चाललंय अनिरुद्ध ?
अरे आता तरी सोड अरुंधतीला , लग्न झालंय तिचं.

आता अनिरुद्ध अरुंधतीशी ज्यावेळेला बोलायला जातो आणि त्याचे मुद्दे मांडतो त्यावेळेला मला हा पाकिस्तानचा पंतप्रधान कश्मीर विषयी बोलतोय असं वाटायला लागतं.

divorce
बातमी वाचली तर मला हाच सीन डोळ्यासमोर आला
“पाकिस्तान हर जगह कश्मीर राग अलापता रहता है और हर बार मुंह की खाता है। भारत जानता है कि आतंक को पालने वाला पाकिस्तान किस तरह के नापाक मंसूबे रखता है। भारत ने मुंहतोड़ जवाब देते हुए कहा है कि वह कश्मीर मुद्दे के बजाय पाकिस्तान में मौजूद आतंकियों से मुकाबला करने पर ध्यान दें, जो लंबे वक्त से भारत के जम्मू कश्मीर को निशाना बनाते रहे हैं।”

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

याच पद्धतीने अरुंधती अनिरुद्ध ला सडेतोड उत्तर देते त्याचे सगळे मुद्दे खोडून काढते,
अनिरुद्ध ला सल्ला देते की लवकर बरे व्हा, स्वतःची काय अवस्था करून घेतली आहे ती बघा, अजून खालच्या पातळीवर जाऊ नका,
पण अनिरुद्ध काय सुधारायचं नाव घेत,
जी गोष्ट आपल्या हातून निष्डून गेली आहे त्या गोष्टीच्या मागे पडण्यात काहीच अर्थ नाही हे त्याला कळत नाही,
खूपशा माणसांचं असंच होतं, ते मागचं सोडून द्यायला तयार नसतात, त्यांचा अहंकार त्यांना तसं करू देत नाही, मागचं सगळं पुसून नव्याने सुरुवात करायची हिम्मत नसते त्यांच्यात,
आणि मग सतत अपमानित होत असतात,
अनिरुद्ध जितका अपमानित झाला आहे तितका क्वचितच कोणी होत असेल, त्याचा अहंकार ठेचायला सगळ्यांनाच आवडतं, परवाच्या एपिसोडमध्ये अनघा म्हणाली बाबा तुम्ही विकृत आहात, इशा म्हणाली मला तुम्हाला बाबा म्हणायची लाज वाटते,
सुलेखाताई म्हणाल्या तुम्हाला सम उपदेशनाची गरज आहे.
पण तुम्ही कितीही काहीही त्याला म्हणा तो काय सुधारायचं नाव घेत..”

मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून त्यांनी अनिरुद्ध काय आणि कसा विचार करतो हे मिलिंद यांच्या नजरेतून लिहिले आहे. त्यांची ही पोस्ट तुफान गाजत असून, त्यावर नेटकऱ्यांसोबतच कलाकार देखील कमेंट्स करत आहेत.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘असं’ जुळलं विनोदी अभिनेता राजपाल यादवचं राधाशी नातं, पहिल्या भेटीचा किस्सा केला शेअर

‘या’ कारणामुळे राजपाल यादवला खावी लागली होती ‘जेलची हवा!’ तुरूंगातही वाजवला आपल्या विनोदी अंदाजाचा डंका

हे देखील वाचा