Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड संजय दत्तच्या नसांमध्ये वाहायचे ‘विष’, अभिनेत्याचे रक्त पिऊन डासही पडायचे मृत्यूमुखी!

संजय दत्तच्या नसांमध्ये वाहायचे ‘विष’, अभिनेत्याचे रक्त पिऊन डासही पडायचे मृत्यूमुखी!

अभिनेता संजय दत्त (Sanjay Dutt) त्याच्या चित्रपटाने जितका चर्चेत राहिला नसेल, त्यापेक्षा जास्त त्याचे वाद आणि संपूर्ण आयुष्यच विवादात राहिले आहे. त्याच्या आयुष्याचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. घरात शिक्षणाचे, राजकीय वातावरण असतानाही संजय दत्तचे आयुष्य मात्र वादात राहिले आहे. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाने आणि दारूच्या व्यसनाने संजय दत्तचे करियर खराब झाले होते. याबाबत संजय दत्तने एका कार्यक्रमात खुलासा केला आहे.

हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तच्या लोकप्रियतेची बात काही औरच असते. संजय दत्तची एक झलक बघायला त्याचे चाहते नेहमीच उत्सुक झालेले असतात. मात्र त्याचे चित्रपटक्षेत्रातील काम जितके गाजले, त्यापेक्षा जास्त त्याच्या खऱ्या आयुष्याची कथा रंजक आहे. घरातूनच अभिनयाचे बाळकडू मिळालेल्या संजय दत्तच्या आयुष्याचा प्रवास खूपच खडतर होता. १९९३ च्या बॉंम्बस्फोट प्रकरणात संजय दत्तला अटक झाल्याने संपूर्ण चित्रपट क्षेत्रात खळबळ माजली होती. या केसमधून तुरुंगात जाऊन आल्यानंतर, संजय दत्तने एका कार्यक्रमात बोलताना त्याच्या दारूच्या व्यसनाचा गंभीर किस्सा सांगितला होता.

याकाळात संजय दत्त संपूर्णपणे नशेच्या आहारी गेला होता. असे कोणतेच व्यसन नव्हते जे त्याने करायचे राहिले नव्हते. याबद्दलच बोलताना संजय दत्तने सांगितले की, “माझ्या शरीरात पूर्णपणे दारू आणि ड्रग्सचे प्रमाण झाले होते. माझे रक्त जर मच्छर जरी पिला तरी, तो मरून जायचा. मी झोपून बघायचो माझ्यापाशी मच्छर आला. मला चावला आणि जसा तो मला चावला तसा तो खाली पडला. त्याने पंख हलवून उठायचे खूप प्रयत्न केले, मात्र त्याला ते शक्य झाले नाही. शेवटी तो उलटा होऊन मरून गेला. म्हणजे माझ्या शरीरात इतकी दारू होती की, मच्छर सुद्धा रक्त पिऊ शकत नव्हते. मला त्या मच्छरचे हसायला येते. कारण त्याने विचार केला असेल की, आता रक्त प्यायला मिळेल. पण त्याला जीव गमवावा लागला, बिचारा.” संजय दत्तच्या या खुलाशाने सगळेच हसायला लागले होते. हा व्हायरल व्हिडिओ जुना असून सध्या तो जोरदार चर्चेत आला आहे.

संजय दत्तने यावेळी आपल्या जेलमधील अनेक अनुभव सांगितले आहेत. यावेळी तो म्हणतो की तरुणांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे आणि आपल्या करिअर कडे लक्ष दिले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी अपेक्षा सोडून दिली पाहिजे. अपेक्षा ठेवणे खूप वाईट गोष्ट आहे. यामुळेच संपूर्ण आयुष्य खराब होते, असेही यावेळी तो म्हणाला.

हेही पाहा – 

हे देखील वाचा