हिंदी चित्रपट जगतात अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना आपल्या पहिल्याच चित्रपटात दिग्गज अभिनेत्यांसोबत काम करायला मिळाले मात्र तरीही या अभिनेत्रींना अपेक्षित यश मिळू शकले नाही. यामध्ये अभिनेत्री गायत्री जोशीच्या (Gayatri Joshi) नावाचा पहिल्यांदा समावेश होतो. गायत्री जोशीने आपल्या पहिल्याच चित्रपटात अभिनेता शाहरुख खानसोबत (Shahrukh Khan) काम केले होते. मात्र तरीही आपल्या अभिनयाची विशेष छाप तिला पाडता आली नाही. आज (२० मार्च) गायत्रीचा वाढदिवस जाणून घेऊ या तिच्याबद्दल.
गायत्री जोशीचा जन्म २० मार्च १९७७ ला नागपूरमध्ये झाला होता. निखळ सौंदर्य लाभलेल्या या तरुणीने आपल्या सुरूवातीच्या काळात अनेक स्पर्धा गाजवल्या. १९९९ मध्ये गायत्रीने फेमिना मिस इंडिया या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत तिने सगळ्यांना थक्क करत अंतिम पाच स्पर्धकांमध्ये आपली जागा मिळवली होती. त्यानंतर २००० मध्ये झालेल्या मिस इंटरनॅशनल स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या यशामुळेच गायत्रीला चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्याची संधी मिळाली. गायत्रीने जगजीत सिंगच्या ‘ये कागज की कश्ती’ आणि हंस राज हंस यांच्या ‘झांझरिया’ गाण्यात आपल्या नृत्याची जादू दाखवली होती.
गायत्रीने २००४ मध्ये आलेल्या ‘स्वदेश’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दिला दमदार सुरूवात केली. या चित्रपटात गायत्रीने शाहरुख खानसोबत काम केले होते. चित्रपटातील गायत्रीच्या अभिनयाचे सगळीकडे कौतुक झाले होते. मात्र हा चित्रपट फ्लॉप ठरला. त्यामुळेच गायत्रीला पुढे बराच काळ नवीन चित्रपट मिळाला नाही. याच कारणाने तिने चित्रपट जगतापासून लांब जाण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान अभिनेत्री गायत्री जोशीने तिचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रसिद्ध उद्योजक विकास ओबेरॉयसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला. विकास ओबेरॉय हे मुंबईमधील एक प्रसिद्ध उद्योजक आहेत. सध्या गायत्री सुद्धा पतीसोबत या उद्योगात काम करत आहे. आता गायत्रीला २ मुले असून ती पुर्णवेळ आपल्या कुटूंबामध्ये व्यक्त असते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
- लीडरशिपची शिकवणी देणाऱ्या पायल रोहितगीवर साधला कंगनाने जोरदार निशाणा, म्हणाली…
- ‘जंजीर’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये फ्लॉप एन्ट्री घेणाऱ्या रामचरच्या ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटांनी केला यूटुबरवर रेकॉर्ड
- जवळपास २७ वर्षांपासून नवऱ्यापासून वेगळ्या राहतात अलका याज्ञीक, भांडण नाही तर ‘हे’ आहे दूर राहण्याचे कारण