Saturday, July 6, 2024

समंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर प्रथमच नागा चैतन्यने शेअर केली पोस्ट; लिहिले, ‘जीवनासाठी प्रेमपत्र’

अभिनेता नागा चैतन्य सध्या त्याच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ट्विटरवर #NagaChaitanya सकाळपासून ट्रेंड करत आहे आणि याची अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे नागा चैतन्य आता तेलगू सिनेमानंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे आणि दुसरे कारण म्हणजे त्याने आता समंथापासून घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर पहिल्यांदाच पोस्ट शेअर केली आहे.

समंथापासून २ ऑक्टोबर रोजी वेगळे झाल्यानंतर नागा चैतन्यने त्याच्या इंस्टाग्रामवर प्रथमच एक पोस्ट शेअर केली आहे. त्याने अलीकडेच वाचलेल्या पुस्तकाचा फोटो शेअर केला आणि त्याला ‘जीवनासाठी प्रेमपत्र’ असे म्हटले. या पोस्टमध्ये, त्याने @officiallymcconaughey टॅग केले आणि त्यांचा प्रवास शेअर केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आणि हे पुस्तक त्याच्यासाठी हिरव्या लाईटप्रमाणे आहे. यापूर्वी, त्याने समंथापासून विभक्त होण्याची पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये त्याने घटस्फोटाचे कारण म्हणून परस्पर मतभेद सांगितले होते आणि त्यानंतर तो ४५ दिवस इंस्टाग्रामपासून दूर राहिला होता.

नागा चैतन्य सोशल मीडियावर फार कमी सक्रिय आहे आणि त्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे की, त्याला सोशल मीडियावर सक्रिय राहणे आवडत नाही. कारण त्याला गोपनीयता ठेवायला आवडते. त्याने त्याच्या इंस्टाग्राम पेजवर आतापर्यंत फक्त ५२ फोटो पोस्ट केले आहेत. ज्यापैकी बरेच समंथासोबत शेअर केले आहेत. घटस्फोटानंतर अनेक जोडप्यांनी आपल्या जोडीदारासोबतचे फोटो हटवले असले तरी चैतन्यने असे केले नाही, तरीही त्याच्या इंस्टाग्रामवर समंथासोबतचे अनेक रोमँटिक फोटो तुम्हाला पाहायला मिळतील.

लग्नाच्या वाढदिवसाच्या काही दिवस आधी समंथा आणि नागा चैतन्य यांनी त्यांची वेगळे होण्याची घोषणा केली. सात फेरे घेण्यापूर्वी या जोडप्याने तीन वर्षे एकमेकांना डेट केले आणि नंतर २०१७ मध्ये गोव्यात डेस्टिनेशन वेडिंग केले. घटस्फोटानंतर समंथाला नागा चैतन्य आणि त्याच्या कुटुंबाकडून २०० कोटी रुपयांची पोटगी देण्यात आली होती. मात्र तिने नकार दिला आणि आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. आता समंथा तिच्या करिअरला नवा ट्विस्ट देत असून, तिने अनेक बॅक टू बॅक चित्रपट साइन केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कार्तिक आर्यनने ‘दोस्ताना २’बद्दल सोडले मौन, चित्रपटातून बाहेर काढण्याबद्दल केले मोठे वक्तव्य

-लवकरच शोमध्ये परतणार शमिता; एकटी नव्हे, तर ‘बिग बॉस १३’चे ‘हे’ दोन स्पर्धकही करणार वाईल्ड कार्ड एन्ट्री

-चहुबाजूंनी विरोध होत असताना, कोमेडियन वीर दासच्या समर्थनार्थ आली काम्या पंजाबी; म्हणाली…

हे देखील वाचा