Friday, March 29, 2024

कार्तिक आर्यनने ‘दोस्ताना २’बद्दल सोडले मौन, चित्रपटातून बाहेर काढण्याबद्दल केले मोठे वक्तव्य

बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे. अलीकडेच, कार्तिक आर्यनचा ‘धमाका’ हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. यापूर्वी तो ‘दोस्ताना २’ या चित्रपटामुळे चर्चेत होता. करण जोहरच्या या चित्रपटातून कार्तिक आर्यनला अचानक बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने कार्तिक या चित्रपटाचा भाग नसल्याची घोषणा केली होती. त्या दिवसांत धर्मा प्रोडक्शनने याचे कारणही सांगितले नव्हते, त्यामुळे कार्तिकचे चाहते खूप निराश झाले होते. मात्र आता कार्तिकने या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडले आहे.

नुकतेच कार्तिक आर्यनने ‘दोस्ताना २’ चित्रपटातून बाहेर काढण्यात आल्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे. या बातमीने त्याच्या कुटुंबाला सर्वात जास्त त्रास दिल्याचे त्याने सांगितले. कार्तिकने सांगितले की, जेव्हा चित्रपटातून रिप्लेस झाल्याची बातमी आली, तेव्हा त्याच्या कुटुंबाला सर्वात जास्त धक्का बसला. तो या इंडस्ट्रीशी संबंधित आहे आणि तो त्याच्या कामावरही खूप केंद्रित आहे. (kartik aaryan breaks silence on exit from karan johar film dostana 2)

त्याच्यासाठी कुटुंबाशिवाय दुसरे काहीही महत्त्वाचे नाही, असेही कार्तिक म्हणाला. त्याने सांगितले की, त्याचे काम म्हणजे त्याचा आवाज. जर तो कोणत्याही कामात स्वत:ला कमी लेखत असेल, तर तो निश्चितच त्यासाठी मेहनत घेतो आणि ते काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो.

महत्वाचे म्हणजे, कार्तिक आर्यनने या चित्रपटाचा काही भाग शूट केला होता आणि अचानक त्याला चित्रपटातून बाहेर काढल्याच्या बातमीने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचबरोबर कार्तिकनंतर ‘दोस्ताना २’मध्ये मुख्य भूमिका करणाऱ्या अभिनेत्याचे नाव अद्याप समोर आलेले नाही.

कार्तिक आर्यनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर नुकताच ओटीटीवर अभिनेत्याचा ‘धमाका’ चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये कार्तिक पत्रकाराच्या भूमिकेत दिसत आहे. त्याचवेळी, आता तो ‘भूल भुलैया २’मध्ये दिसणार आहे, जो एक हॉरर ड्रामा चित्रपट आहे. याशिवाय तो ‘फ्रेडी’, ‘शहजादा’ यांसारख्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-KBC: शोदरम्यान स्पर्धकाने बिग बींना जया बच्चनबद्दल विचारला ‘असा’ प्रश्न, अभिनेत्याने शो सोडण्याची केली विनंती

-चार मुली जन्माला आल्यानंतर तुटले होते वडिलांचे मन, त्याच मुली आज बॉलिवूडवर गाजवतायत अधिराज्य

-‘सूर्यवंशी’मुळे पाकिस्तान त्रस्त! राष्ट्रपतींसह ‘या’ अभिनेत्रीने इस्लामोफोबियाबद्दल व्यक्त केली चिंता

हे देखील वाचा