बॉलिवूडची बार्बी डॉल म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कॅटरिना कैफ (Katrina Kaif) सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. कॅटरिनाचे नाव विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) अनेक दिवसांपासून जोडले जात आहे आणि आता तिच्या लग्नाच्या बातम्याही बऱ्याच दिवसांपासून जोर धरत आहेत. कॅटरिनाच्या लग्नाच्या बातम्यांदरम्यान तिच्या जुन्या मुलाखतीच्या चर्चा व्हायरल होत आहेत. कॅटरिनाने फार पूर्वीच सांगितले होते की, तिच्या आयुष्यात लग्नाला खूप महत्त्व आहे आणि जर तिला कधी वाटले की, कामापेक्षा लग्न महत्त्वाचे आहे, तर ती चित्रपटात काम करणेही थांबवेल.
कॅटरिनाला आयुष्यात भासते वडिलांची उणीव
कॅटरिनाने एकदा असेही म्हटले होते की, तिच्या मुलांना आई-वडिलांचा पाठिंबा मिळावा अशी तिची इच्छा आहे.आई सुझैन आणि वडील मोहम्मद कैफ यांचा ती लहान असताना घटस्फोट झाल्याचे तिने सांगितले होते. तिला तिच्या आयुष्यात नेहमी वडिलांची उणीव जाणवते. तिच्या आईने आठ मुलांना एकटीने वाढवल्याचे तिने सांगितले होते. (actress katrina kaif once talked about her parents divorce and emptiness of father figure in life says i do not want that for my kids)
कॅटरिनाने सांगितले की, तिला तिच्या आयुष्यात वडिलांची उणीव नेहमीच जाणवत असून, तिने हे दुःख इतकं सोसलं आहे की, आपल्या मुलांना अशी कमतरता कधीच जाणवू नये असे तिला वाटते. एका मुलाखतीत कॅटरिनाने म्हणाली होती की, “वडील नसल्यामुळे तुमच्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण होते जी तुम्ही भरून काढू शकत नाही. जेव्हा मला मुले होतील तेव्हा त्यांना अशा कोणत्याही गोष्टीला सामोरे जावे लागणार नाही.”
कॅटरिनाने सांगितले की, प्रत्येक वेळी तिच्या आयुष्यात असे अनेक भावनिक क्षण आले ज्याने तिला खूप त्रास दिला. अशा लोकांना पाहून बरे वाटते की, त्यांना वडील आहेत आणि त्यांना दोन्ही पालकांचे प्रेम मिळाले आहे.
लग्नाबद्दल बोलायचे झाले, तर चौथ का बरवरामधील हॉटेल सिक्स सेन्सेसमध्ये विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. प्री-वेडिंग फंक्शन्स ७ डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. परंतु त्यापूर्वी संपूर्ण हॉटेल परिसरात उच्च सुरक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. या काळात बाहेरच्या व्यक्तीला हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. हॉटेलच्या एका भागात सुरू असलेले बांधकामही बंद करण्यात आले असून, सर्व कामगारांना सोडण्यात आले आहे. लग्नाच्या वेळी हॉटेलमध्ये जे काही कर्मचारी उपस्थित असतील. यापैकी कोणाकडेही मोबाईल ठेवू दिला जाणार नाही.
आजपासून हॉटेल कर्मचारी, इव्हेंट कंपनी आणि पाहुणे वगळता कोणालाही हॉटेल सिक्स सेन्सेसमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. याशिवाय हॉटेलमध्ये कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत नेऊ शकत नाही. लग्नाच्या व्यवस्थेबाबत कोणत्याही प्रकारची कमतरता भासू नये यासाठी हॉटेल व्यवस्थापनानेही पूर्ण तयारी सुरू केली आहे. महालाच्या स्वच्छतेपासून ते सजावटीपर्यंत सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…