अनुपम खेर यांनी मागील अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर अधिराज्य गाजवले आहे. त्यांच्या वेग वेगळ्या पात्रांनी त्यांनी नेहमीच प्रेक्षकांना हसवले आहे. अशातच मंगळवारी (7 मार्च) राेजी ते त्यांचा 68वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांनी त्यांच्या अभिनयाचा डंका परदेशातही गाजवला आहे. त्यांनी मेहनतीने त्यांचे नाव कमावले आहे. त्यांनी सगळ्या गोष्टींमध्ये खूप मेहनत घेतली आहे. त्यांचा हम आपके है कौन हा चित्रपटात खूप गाजला होता. परंतु अनेकांना ही गोष्ट माहित देखील नसेल की, त्या चित्रपटादरम्यान ते आजारी होते, तरी देखील त्यांनी शूटिंग केली होती.
अनुपम खेर यांचा जन्म 7मार्च 1955 रोजी शिमला येथे झाला. त्यांना लहानपानापासूनच अभिनयाची आवड होती. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटात त्यांनी त्यांच्या अभिनयाने सगळ्यांना हसवले. परंतु त्यांनी एकदा खुलासा केला की, या चित्रपटाची शूटिंग करताना ते आजाराशी झुंज देत होते. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांना फेशिअल पॅरालिसिस झाला होता. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि हसत हसत या सगळ्याचा सामना केला. डॉक्टरांनी त्यांना आराम करायला सांगितला होता, तरी देखील त्यांनी शूटिंग पूर्ण केली. (anupam kher celebrate his birthday , lets know about his career)

त्यांनी एका शोमध्ये या गोष्टीचा खुलासा केला होता.त्यांनी सांगितले की, “मी एक दिवस अनिल कपूर यांच्या घरी जेवायला गेलो होतो. त्यावेळी माझ्या डोळ्याच्या पापण्यांची उघड झोप होत नव्हती. त्यावेळी मला असे वाटले की. कदाचित मी दमले आहे त्यामुळे मला असे होत आहे. परंतु दुसऱ्या दिवशी ब्रश करताना मला समजले की, माझ्या तोंडातून एका बाजूने पाणी येत आहे. तसेच डोळ्यात साबण देखील गेला होता.

त्यांनी पुढे सांगितले की, “मी यश चोप्रा यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळी मी त्यांना म्हणालो की, यशजी माझा चेहरा डाव्या बाजूला शिफ्ट झाला आहे. त्यावेळी ते म्हणाले की, मस्करी करू नको डॉक्टरकडे जा. त्यांना असे वाटले की, मी मस्करी करत आहे.” त्यानंतर त्यांनी सांगितले की, “ते डॉक्टरांकडे गेले त्यावेळी डॉक्टरांनी सांगितले की, त्यांना फेशिअल पॅरालिसिस झाला आहे. त्यांना दोन महिने सगळं काही बंद करण्यास सांगितले होते.” त्यावेळी मी विचार केला की, जर मी आता घरी बसलो तर आयुष्यभर मला घरीच बसावे लागेल. मी हार मानली नाही आणि शूटिंगसाठी स्टुडिओमध्ये पोहोचलो.”
त्यांनी पुढे सांगितले की, “सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांना वाटले की, मी मुद्दाम असे करत आहे. त्यानंतर मी सगळ्यांना एकत्र घेतले आणि नक्की काय प्रॉब्लेम झाला आहे हे सांगितले. ” यानंतर त्यांचे अनेक सीन बदलण्यात आले होते. करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. त्यांनी मुंबईला आल्यानंतर काही दिवस रेल्वे स्टेशनवर झोपून काढले. कारण घर घेण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी अनेक छोट्या मोठ्या चित्रपटात काम केले. त्यानंतर महेश भट्ट यांच्या ‘सारांश’ या चित्रपटाने त्यांना चांगली ओळख दिली.
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
प्रोजेक्ट के सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांचा गंभीर अपघात, हालचाल करणे झाले अवघड
‘प्रेग्नन्सीचं ड्रामा करते’, म्हणणाऱ्यांवर संतापली दीपिका कक्कर; व्हिडिओ शेअर करत म्हणाली…