छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम मानला जाणाऱ्या ‘बिग बॉस‘ मराठी सिजनचा 4 ने (दि, 8 जानेवारी) रोजी निरोप घेतला आहे, शेवटी 4थ्या पर्वाचा शिलेदार अक्षय केळकर ठरला. यंदाच्या बिग बॉसने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली असून एकसे बढकर एक कालाकार या सिजनला लाभले होते. मात्र, अक्षय प्रेक्षकांची मने जिंकण्यास यशस्वी ठरला. सध्या सर्वत्र अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. अशातच अपूर्वा नेमळेकर हिने पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
यंदाचा बिग बॉस (Bigg Boss) मराठी पर्व 4 ने प्रेक्षकांना वेड लावले होते. त्याशिवाय धमाकेदार कलाकरा अक्षय केळकर (Akshay Kelkar), अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), राखी सावंत (Rakhi Sawant), किरण माने (Kiran Mane) आणि अमृता धोंगडे (Amruta Dhongde) हे पाड स्पर्धक टॉप 5 मध्ये होते. मात्र, राखी सावंतने 9 लाख रुपयाची बाजी मारुन घरातून एक्जीट घेतला आणि त्यापाठोपाठ अमृता धोंगडेंही घरातून बाहेर आली. यानंतर टॉप 3 मध्ये किरण माने, अपूर्वा मेनळेकर आणि अक्षय केळकर हे स्पर्धक होते. यानंतर किरण माने यांनाही घराबाहेर जावे लागले आणि अंतिम सोहळ्यामध्ये दोन टक्करचे खिलाडी म्हणजेच अपूर्वा आणि अक्षय हे दोघे राहिले. शेवटी शेवंताला मागे टाकून अक्षय केळकरने बाजी मारली आणि विजेतेपद आपल्या नावावर केले.
चौथ्या पर्वाचा विजेता अक्षय केळकर ठरला असून त्याला बिग बॉसची ट्रॉफी आणि 15 लाख 55 हजार रुपये बक्षिस म्हणून मिळाले आहेत. त्याचबरोबर पु,ना. गाडगीळ आणि सन्स तर्फे 10 लाख रुपयांचे बंपर गिफ्ट व्हाउचर मिळालं आहे. अक्षय केळकर विजेता झाल्यानंतर नुकतं अपूर्वा नेमळेकर हिने आपल्या अधिकृत इस्टग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, जी तुफान व्हायरल झाली आहे. अपूर्वाने पोस्ट शेअर करत लिहिले की, “प्रवास संपला तरीही तुमचं प्रेम काही कमी झालं नाही अपूर्वा आर्मी आणि माझ्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार ! हा प्रवास तुमच्या शिवाय अपूर्ण आहे.”
View this post on Instagram
अनेक चाहत्यांनी अंदाज लावला होता की, मराठी वाहिनीवरील शेवंताच बाजी मारणार आहे. त्याशिवाय तिला विजेता ठरवा त्यामुळे तिच्या चाहत्यांनी बॅनरही लावले होते मात्र, वजेता अक्षय केळकर ठरला. अशातच्या अपूर्वाच्या या पोस्टनंतर तिच्या चाहत्यांनी देखिल तिचे कौतुक केले आहे. एका युजरने लिहिले की, “आमच्यासाठी तूच विजेती आहेत. तू अक्षयपेक्षा जास्त पात्र आहेस.” तर दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, “तूच विजेतेपदासाठी खरोखर पात्र आहेस.” बिग बॉस पूर्वीच अपूर्वाने ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकली होती. त्यामुळे अनेक चाहत्यांची इच्छा होती की, अपूर्वाच विजेता असायला हवी.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘…तर अशोक सराफ मुख्यमंत्री असते’, राज ठाकरेंनी केले मराठी दिग्गजाचे कौतुक
‘बदल खूप जवळून पाहिलाय मी’, म्हणत रुचिरा जाधवने शेअर केलेली पोस्ट झाली व्हायरल