भारतीय चित्रपटसृष्टीत ‘किंग्स ऑफ रोमान्स’ असं शाहरुख खान याला म्हणलं जातं. मात्र, एक असा अभिनेता आहे, ज्याने शाहरुखच्या एक नाही, तर दोन-दोन अभिनेत्रींना त्याच्यापासून दूर घेऊन गेला होता. आपण बोलत आहोत, अभिनेता दीपक तिजोरीबद्दल. हिंदी सिनेसृष्टीत जेव्हाही जिगरी मित्राच्या रोलबद्दल चर्चा होते, तेव्हा दीपक तिजोरी याचं नाव सगळ्यात टॉपलाच असतं. भावानं या विषयात पीएचडी केलीय असं म्हणलं तरी चुकीचं ठरणार नाही. कारण, सर्वाधिक सिनेमात हिरोचा मित्र म्हणून दीपकच झळकलाय. सिनेमात हिरोच्या बायकोच्याही आधी मित्राच्या पात्रासाठी दीपिकचे सिलेक्शन व्हायचे. पण शेवटी कोणतीही गोष्ट कायम तशीच राहत नाही ना.
वाढत्या वयामुळं आणि हिरोंना मित्राची गरज जरा कमीच पडू लागली. त्यामुळे सर्वांची साथ देणारा दीपक मात्र एकटाच पडला. त्याला कुणी साथ दिली नाही. दीपकलाही हिरोच बनायचं होतं. दीपकच्या बाबतीत ‘कशी नशिबानं थट्टा आज मांडली’, असंच म्हणलं पाहिजे. एक वेळ आली होती, जेव्हा त्याला शाहरुख आणि आमिर खानसारख्या कलाकारांसोबत हिरो बनवलं होतं, पण त्याचा काही फायदा झाला नाहीय. या लेखातून आपण शाहरुखच्या हिरोईनी पळवणारा आणि दोस्तांचा दोस्त असणाऱ्या दीपक तिजोरीबद्दल जाणून घेऊ.
दीपकचा जन्म २८ ऑगस्ट, १९६१ रोजी स्वप्ननगरी मुंबईतच झालाय. दीपकचं शिक्षण नरसी मुंजी महाविद्यालयात झालं होतं. जिथं त्यांला सिनेमाची गोडी निर्माण झालेली. त्यानंतर तो एका थिएटर ग्रूपमध्ये सहभागी झाला होता. ज्यात आमिर खान, आशुतोष गोवारीकर, परेश रावल यांसारखे कलाकार होते. या गटातील दीपक यांच्या कामगिरीचे अनेकदा कौतुक झाले आणि अशातच त्यांच्या मनात अभिनेता होण्याची इच्छा निर्माण झाली. दीपक बॉलिवूडमध्ये अभिनेता बनण्याचं स्वप्न उराशी घेऊन आलेला. त्याला पहिला सिनेमा १९८८ साली मिळाला. तो ‘तेरा नाम मेरा नाम.’ यात मात्र, तो मुख्य अभिनेता नव्हता, तर त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती.
या पहिल्या सिनेमानंतर त्यानं आणखी बरेच सिनेमे केले, जे खूप हिट देखील होते. परंतु जवळजवळ सर्व हिट चित्रपटांमध्ये दीपक तिजोरी हा सहाय्यक अभिनेता म्हणूनच पात्र साकारताना दिसला. दीपकनं ‘आशिकी’, ‘खिलाडी’, ‘जो जीता वही सिकंदर’, ‘कभी हां कभी ना’, ‘अंजाम’ यांसारख्या अनेक सिनेमात काम केलं होतं. या सिनेमांमध्ये दीपकचा अभिनय चाहत्यांना खूपच आवडला होता. दीपकला अभिनयक्षेत्रात अव्वल अभिनेता बनण्याची इच्छा होती. एकदा त्याची ही इच्छा पूर्णही झाली. ते म्हणजे साल १९९३ मध्ये आलेल्या ‘पेहला नशा’ या सिनेमात त्याला अभिनेता म्हणून संधी मिळाली. या सिनेमात शाहरुख खान आणि आमिर खान देखील होते. तसेच पूजा भट्ट आणि रवीना टंडन यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र, इतकी मजबूत स्टारकास्ट असूनही हा सिनेमा फ्लॉप झाला आणि दीपकला मुख्य अभिनेता म्हणून यशस्वी होता आले नाही.
पुढं तो शाहरुखच्या अभिनेत्रीही घेऊन गेला, पण यश काय वाट्याला आलंच नाही. दीपक तिजोरी शाहरुख खानसोबत ‘कभी हा कभी ना’ आणि ‘अंजाम’ सिनेमात दिसला होता. या दोन्ही सिनेमामध्ये दीपक तिजोरीला अभिनेत्रीही मिळाली होती, पण शाहरुख खानसोबत एकही अभिनेत्री नव्हती. तरीही त्याने दीपकला मागे टाकलं आणि दीपक पुन्हा एकदा सहाय्यक अभिनेता म्हणून मर्यादित राहिला.
आता सिनेमात काम करून दमल्यानंतर दीपकही दिग्दर्शनात घुसण्यासाठी सज्ज झाला होता. त्यानं सिनेमे दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. २००३ मध्ये एका ऍडल्ट सिनेमाद्वारे त्यानं दिग्दर्शनात पदार्पण केलं होतं. समीक्षकांपासून प्रेक्षकांपर्यंत सर्वांनीच हा सिनेमा नाकारला. सेन्सॉर बोर्डातही हा सिनेमातील बोल्ड आशय आणि दृश्यांमुळे अडकला होता. यानंतर त्यांनं आणखी बरेच सिनेमे दिग्दर्शित केले. ज्यात ‘टॉम डिक आणि हॅरी’, ‘फॉक्स’ आणि ‘खामोशी- खवु की एक रात’ यांसारख्या सिनेमांचा फ्लॉप समावेश होता.
View this post on Instagram
दीपक तिजोरी आता आहे तरी कुठं आणि तो काय करतोय याबद्दल बोलायचं झालं, तर तो सिनेमांपासून कायमचा दूर झालेला नाहीये. छोट्या-मोठ्या सिनेमात तो दिसलाय. तो अखेरचा २०१८ मध्ये आलेल्या संजय दत्त स्टारर ‘साहब बीवी और गँगस्टर ३’ मध्ये दिसला होता. २००३ मध्ये, दीपकने ‘उप्स’ चित्रपटाद्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं होतं. पुढे त्यानं ‘फरेब’ आणि ‘टॉम डिक अँड हॅरी’ सारखं सिनेमे केले. दिग्दर्शक म्हणून त्याचा शेवटचा सिनेमा २०१६ मध्ये रिलीझ झाला होता. या सिनेमात होते रणदीप हुड्डा आणि काजल अग्रवाल. सिनेमाचं नाव होतं ‘दो लफ्जों की कहानी’. पुढं २०१९ मध्ये, त्यानं Zee5 वरील ‘अभय’ या वेब शोमध्येही काम केलं. दीपक सध्या मुंबईत असून तो त्याचा आगामी सिनेमा बनवण्यात व्यस्त आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आधी अभिनेत्रींना डेट करणाऱ्या ‘या’ सुपरस्टार्सना शेवटी सामान्य मुलीशी थाटावा लागला संसार
व्हिलनच्या एका फायटीमुळे अमिताभ गेले असते देवाघरी, डॉक्टरही जयाला म्हणालेले, ‘मरण्यापूर्वी शेवटचं भेटून घ्या’
‘मी हिंदुस्तानी मुलगी…’, म्हणत लंडनच्या थेटरात किस करू पाहणाऱ्या परदेशी अभिनेत्याला सुनावणारी निम्मी