एकता कपूरच्या ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या प्रसिद्ध मालिकेने घराघरात अशी ओळख निर्माण केली होती की, आजही ही मालिका प्रेक्षकांच्या लक्षात आहे. या मालिकेची स्टोरी लाईन तर जबरदस्त होतीच. पण त्यातील पात्रांनीही प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली. आता एकता कपूरने या मालिकेबाबत मोठी घोषणा केली आहे. हे जाणून चाहत्यांचे चेहरे नक्कीच फुलतील.
१३ वर्षांनंतर येत आहे परत
‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ ही मालिका २००८ साली बंद झाली होती. अशा परिस्थितीत १३ वर्षांनंतर पुन्हा एकदा एकता कपूर ही मालिका चाहत्यांसाठी घेऊन आली आहे. एकता कपूरने स्वतः सोशल मीडियावर ही माहिती दिली.
प्रोमो शेअर करून केला खुलासा
एकता कपूरने तिच्या अधिकृत अकाऊंटवर या शोचा प्रोमो शेअर केला आणि कॅप्शनही लिहिले. एकता कपूरने कॅप्शनमध्ये लिहिले की, “या प्रोमोची झलक पाहून सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आज जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा सगळ्या आठवणी आणि सगळे क्षण आठवतात किती प्रेम मिळाले. या प्रवासात पुन्हा त्याच प्रेमाने सामील व्हा. बुधवारपासून रोज संध्याकाळी ५ वाजता फक्त स्टार प्लसवर.”
तीन कलाकारांना विचारला प्रश्न
या कॅप्शनसोबत एकता कपूरने या शोचे प्रमुख कलाकार स्मृती इराणी, अमर उपाध्याय आणि रोनित रॉय यांना प्रश्नही विचारले. या तिघांना टॅग करत एकता कपूरने विचारले की, “इतक्या वर्षांनी हा प्रोमो पाहून तुम्हा तिघांना कसे वाटते?”
चाहते झाले खूश
एकता कपूरच्या या घोषणेनंतर चाहते चांगलेच उत्साहित झाले आहेत. या पोस्टवर ते सातत्याने कमेंटही करत आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री तस्नीम शेखने कमेंट करताना लिहिले की, “ओमजी.” एका युजरने कमेंट करताना लिहिले की, “व्वा, आठवणी ताज्या आहेत, एकता. देव तुम्हाला आशीर्वाद देईल.” यासह अनेक चाहते वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
हेही वाचा –