Saturday, July 27, 2024

शाहरुख खानसोबत लग्न केल्यानंतर गौरी खानला मुंबईत राहण्याची नव्हती इच्छा , मग या कारणामुळे बदलला निर्णय

बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची (Shahrukh khan) पत्नी गौरी खान (Gauri Khan) देखील प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंटची निर्माती असण्यासोबतच गौरी एक इंटिरियर डिझायनर देखील आहे. शाहरुखप्रमाणेच गौरीही अनेकदा चर्चेत असते. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत गौरीने तिच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल सांगितले. यादरम्यान, तिने आपल्या दैनंदिन दिनचर्येवर मनमोकळेपणाने चर्चा केली आणि सांगितले की तिची मुले ही त्यांच्यासाठी प्राधान्य आहेत.

मुलाखतीत तिच्या दैनंदिन दिनचर्येबद्दल बोलताना गौरी म्हणाली, ‘मी सकाळची व्यक्ती नाही, कारण घरातील सर्वजण रात्री उशिरापर्यंत जागे असतात. अशा परिस्थितीत मी सकाळी १० वाजता उठते. माझ्यासाठी सकाळची कॉफी, जिम, दुपारचे जेवण, माझे काम आणि माझी मुले ही माझी पहिली प्राथमिकता आहे.

गौरी पुढे म्हणाली, “मी आर्यन, सुहाना आणि अबरामसाठी वेळ काढते, खासकरून जेव्हा अबराम शाळेतून घरी येतो. या काळात मी त्याच्यासोबत थोडा वेळ घालवते. मला साधे जीवन आवडते, तर शाहरुख हा रात्रीचा उल्लू आहे, असे तो स्वतः सांगतो.”

शाहरुख खान आणि गौरी खान तीन दशकांपासून एकत्र आहेत, दोघांच्या लग्नाला 32 वर्षांहून अधिक काळ झाला आहे. अलीकडेच एका मुलाखतीत गौरीने सांगितले होते की शाहरुख आणि गौरीचे एकाच दिवशी तीन लग्न झाले होते, ज्यामध्ये एक नोंदणीकृत विवाहासोबत मुस्लिम आणि हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह झाला होता. सुरुवातीला गौरीला मुंबईत स्थायिक व्हायला संकोच वाटत होता, पण गौरी मुंबईच्या प्रेमात पडली जेव्हा शाहरुख खानने प्रसिद्धी मिळवली आणि मन्नतमध्ये आपले घर केले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

‘घटस्फोटाचा मुलगा आझादला धक्का बसू नये म्हणून…’ किरण रावने केला आमिरसोबतच्या नात्याचा खुलासा
Kangana Ranaut: ‘हीच ती योग्य वेळ…’ कंगना रणौत निवडणुक लढवणार?

हे देखील वाचा