टेलिव्हिजन विश्वातील स्टार प्रवाह (Star Pravah) या मराठी वाहिनीवर प्रसिद्ध होणाऱ्या ‘मुलगी झाली हो’ (Mulgi Zali Ho) या मालिकेतील स्टार कलाकार अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांनी शुक्रवार (४ फेब्रुवारी) पत्रकार परिषद घेतली.
मुलगी झाली हो या मालिकेच्या व्यवस्थापकांनी किरण मानेंना विनासुचना कामावरुन काढले. तसेच हकालपट्टी केल्यानंतर त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते, ज्याचे खंडन किरण मानेंनी अनेकदा केले. पंरतू, या सर्व घडामोडींमुळे अभिनेता किरण माने विशेष चर्चेत आले होते. त्यामुळे स्वतःवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि काही खुलासे करण्याठी अभिनेता माने पत्रकार परिषद घेणार होते. त्याच अनुषंगांने माने आणि त्याचे वकील असिम सरोदे यांनी शुक्रवारी प्रत्रकार परिषद घेतली, ज्यात माने आणि असिम सरोदे यांनी काही खुलासे केले आणि काही मागण्या केल्यात. (Marathi Actor Kiran Mane Press Conference)
काय म्हणाले किरण माने यांचे वकिल असिम सरोदे?
मुंबई प्रेस क्लब (Mumbai Press Club) येथे किरण माने यांनी वकिल असिम सरोदे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. ज्यावेळी बोलताना असिम सरोदे यांनी अनेक मुद्दे मांडले आणि काही मागण्या केल्या,
काय म्हणाले वकिल असिम सरोदे;
- दहापेक्षा अधिक कर्मचारी असतील, तिथे महिलांच्या सुरक्षतेतेसाठी अंतर्गत समिती असावी असा कायदा आहे.
- जातीधर्मावर आधारित भेदभाव आणि 2014-15 नंतर पुढे आलेली आणखीन एक चुकीची गोष्ट म्हणजे राजकिय भुमिका घेतल्यानंतर होणारा भेदभाव किंवा टीका.
- स्त्रियांशी गैरवर्तन केलं असं चित्र किरण माने यांच्याबाबत रंगवण्यात आलं, जर त्यांच्याबद्दल तक्रार होती तर त्यांना तोंडी समज दिली गेली, असं सांगितलं गेलं. मात्र, कायद्यानुसार महिलेने लेखी तक्रार आणि माने यांना लेखी नोटीस जायला हवी होती. यासाठी अंतर्गत समिती असते, ती हे सर्व काम करते., हे एकप्रकारे कायद्याचं उल्लंघन आहे.
- या प्रकरणातून पुढे आलेला प्रश्न म्हणजे कला क्षेत्रात काम करणारे कलाकार हे मजूर आहेत का? कोणतंही आश्नासन न देता त्यांना फक्त राबवून घेणे, हा प्रकार यातून समोर आला आहे. आणि एक अस्थिर वास्तव यातून दिसलंय.
- किरण मानेंना कुठलंही कारण न देता कामावरुन काढून टाकलं. आणि खरं तर ज्याचं मुख्य कारण राजकीय भुमिका घेतलं हेच होतं, मात्र सांगताना महिलांशी असभ्य वर्तन केलं असं सांगण्यात आले.
- जेव्हा सर्वबाजूंनी किरण माने यांना नोटीस दिली होती का? हा प्रश्न उपस्थित करण्यात आला, तेव्हा त्यांना बॅक डेटची नोटीस देण्यात आली.
- या प्रकरणातून बॉलिवूड, मराठी क्षेत्रातील बेजबाबदारपणा उघडकीस आला आहे.
- एकंदरीत माने यांची बदनामी करण्यात आलीये, त्यांच्याबद्दल वाईट प्रतिमा निर्माण करण्यात आलीय. आणी त्यांना वाळीत टाकण्याचा प्रकार करण्यात आलाय.
- प्रोडक्शन हाऊसने किरण माने यांना 5 कोटी नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांची लेखी स्वरुपात माफी मागावी.
- तसेच त्यांना पुन्हा ‘मुलगी झाली हो’ कार्यक्रमात घेतले पाहिजे.
हेही वाचा – ‘त्या माजोरड्यांना मेसेज गेला पायजे, ‘मराठी कलाकार’ नडला तर तुमचा बाजार उठवंल!’ किरण मानेंची पोस्ट चर्चेत
संपूर्ण प्रकरण काय?
स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमध्ये अभिनेते किरण माने यांनी विलास पाटील हे पात्र साकारलं, जे त्यांच्या अभिनयाने घराघरात पोहचलं. या मालिकेच्या पात्राबरोबरच किरण माने हे सातत्याने समाजमाध्यमांवर अनेक विषयांवर मुद्देसुदपणे व्यक्त होतात. तसेच त्यांच्या राजकीय भूमिकेमुळे बऱ्याचदा ते चर्चेत राहिलेत. मात्र, त्यांच्या स्पष्ट राजकीय भुमिकांमुळेच त्यांच्या अडचणीत वाढ झाली. त्यांना राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. तसेच, याबाबत त्यांना कुठलीही पूर्वसुचना देण्यात आली नव्हती.
हेही वाचा – राजकीय भुमिका घेतल्याने अभिनेता किरण मानेची मालिकेतून हकालपट्टी? सोशल मीडियावर संतापाची लाट
त्यानंतर समाजमाध्यमांवर सर्वच क्षेत्रातून किरण माने यांच्यावर झालेल्या कारवाईचा निशेष करण्यात आला. पुढे जाऊन माने यांच्याविरोधात सहकलाकार महिलेने तक्रार केली त्यानंतर त्यांनी काढण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, माने यांनी ते नाकारत आपल्याविरोधात पद्धतशीरपणे कट कारस्थान रचून आपली हाकालपट्टी करण्यात आल्याचे म्हटले. तसेच, आपण घेतलेल्या स्पष्ट राजकीय भुमिका हेच याला कारण असल्याचेही त्यांनी म्हटले होते. (Actor Kiran Mane Removed From Mulgi Zali Ho Serial Of Star Pravah)
अधिक वाचा –