Friday, July 5, 2024

मराठी मालिकांमध्ये वाजतायेत सनई चौघडे, तर ‘या’ मालिकांमध्ये सुरुये लग्नाचा ट्रॅक

मालिका या आपल्या दैनंदिन आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. दिवसभराच्या धकाधकीनंतर रात्री कुटुंबासोबत बसून पाहिलेल्या मालिका सगळ्यांना एक आनंद देऊन जातात. मराठी टेलिव्हिजनवरील सगळ्याच मालिका खूप चर्चेत आहेत. मालिका म्हटल्यावर त्यात चढ-उतार येणे अगदी साहजिक गोष्ट आहे. अशातच अनेक मालिकांमध्ये सध्या आनंदाचे शुभ वातावरण चालू आहे. म्हणजेच अनेक मालिकांमध्ये सध्या लग्नाचे ट्रॅक सुरू झाले आहेत. हिंदू धर्मानुसार, तुळशीचे लग्न झाल्यावर सगळ्यांचे विवाह होण्यास सुरू होतात. त्याचप्रमाणे अनेक मालिकांमध्ये सनई चौघडे वाजत आहेत. चला तर जाणून घेऊया कोणत्या मालिकांमध्ये सध्या लग्नाचे ट्रॅक सुरू आहेत. (Marathi serials those on track of wedding scenes)

अजूनही बरसात आहे
सोनी मराठीवरील ‘अजूनही बरसात आहे’ ही मालिका चांगलीच चर्चेत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे या मालिकेत मुक्ता बर्वे आणि उमेश कामत हे मुख्य भूमिकेत आहेत. अनेक वर्ष दुरावलेले प्रेमी बऱ्याच वर्षांनी एकमेकांना भेटतात आणि पुन्हा नव्याने प्रेमात पडतात, ही कथा मालिकेत दाखवली आहे. त्यामुळे सध्या मालिकेत मीरा आणि आदीराज यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. त्यांच्या लग्नात ते मस्त धमाल करताना दिसत आहेत. तसेच त्यांच्या लग्नात उमेश कामतची पत्नी आणि अभिनेत्री प्रिया बापट हिचे खास आकर्षण दाखवले आहे.

सुख म्हणजे नक्की काय असतं
स्टार प्रवाह या वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका देखील अनेकांना आवडते. मालिकेत गौरी आणि जयदीप यांचे पुन्हा एकदा लग्न लागलेले दाखवले आहे. सुरुवातीला त्यांचे लग्न झाले होते परंतु लग्नात अनेक हेवेदावे आले होते. त्यामुळे हे लग्न त्यांचे अगदी थाटामाटात पार पडले आहे. त्यांचे प्री-वेडिंग फोटोशूट, हळद, संगीत, मेहेंदी हे सगळे प्रोग्राम दाखवण्यात आले आहेत.

सुंदरा मनामध्ये भरली
कलर्स मराठीवरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची कहाणी काही वेगळी आणि सर्व सामान्यांना भावणारी आहे. मालिकेत सध्या अभिमन्यू आणि लतिकाचे लग्न पुन्हा एकदा झालेले दाखवले आहे. खरंतर हे अगदी अनपेक्षित झालेले लग्न दाखवले आहे. दोघांना त्यांच्या प्रेमाची जाणीव होण्यासाठी त्यांच्या घरांच्यानी त्यांना न सांगता हा विवाहसोहळा रचला आहे. त्यांच्या लग्नाचा हा ट्रॅक प्रेक्षकांना खूप आवडला आहे.

मुलगी झाली हो
स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेचा संपूर्ण महाराष्ट्रभर चांगलाच गाजावाजा आहे. खास म्हणजे मालिकेतील अभिनेत्रीने आतापर्यंत एकही डायलॉग न बोलता सगळ्यांचे मन जिंकले आहे. अशातच माऊ आणि शौनक यांचे लग्न झाले आहे. त्यांचे प्रेम सिद्ध करण्यासाठी त्यांना अनेक परीक्षा द्याव्या लागल्या आहेत. या सगळ्या परीक्षा पास होऊन अखेर त्यांचे लग्न झाले आहे. त्यांच्या लग्नाची प्रेक्षकांनी अनेक दिवस वाट पाहिली आहे. त्यांच्या लग्नाच्या आधीचे सगळे प्रोग्राम देखील दाखवण्यात आले आहेत.

आई कुठे काय करते
टेलिव्हिजनवरील सर्वात जास्त चर्चेत असणारी आणि टीआरपीच्या यादीत उच्चांक गाठणारी मालिका म्हणजेच ‘आई कुठे काय करते’. या मालिकेत सध्या अभिषेक आणि अनघा यांच्या लग्नाचा ट्रॅक सुरू आहे. त्यांच्या लग्नाची देखील प्रेक्षकांनी खूप वाट पाहिली आहे. अखेर मालिकेत त्यांच्या गडबड पाहून प्रेक्षकांना खूप आनंद झाला आहे.

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
झी मराठीवरील ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळवला आहे. मालिकेत सिद्धार्थ आणि आदिती यांच्या जोडीने तर आख्ख्या महाराष्ट्राला वेड लावले आहे. तसेच एकत्र कुटुंब पद्धती या मालिकेत दाखवली आहे. नेहमीच एकमेकांचा राग करणाऱ्या, चुगली करणाऱ्या बायका एकत्र देखील सुखाने राहू शकतात. हे या मालिकेत दाखवले आहे. अशातच मालिकेत आदिती आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाची तयारी चालू आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तुम्ही किंग आहात आणि किंग सारखंच राहायचं’, पत्नीकडून उत्कर्ष शिंदेला मिळाली सकारात्मक ऊर्जा

‘मन झालं बाजिंद’ मालिकेतील राया कृष्णाला घेऊन जाणार बुलेटवर ‘भुरुम भुरुम’, व्हिडिओ पाहाच

-‘मैदान मार’ गाण्यातून श्रेयश जाधवने व्यक्त केली देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रती कृतज्ञता

हे देखील वाचा