Thursday, March 13, 2025
Home बॉलीवूड सलमान खानच्या घरी अचानक पोहचले मुंबई पोलिस, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

सलमान खानच्या घरी अचानक पोहचले मुंबई पोलिस, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या (siddhu musewala) हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीने पुन्हा एकदा सलमान खानला धमकी दिली आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक सोमवारी सलमान खानच्या घरी चौकशीसाठी पोहोचले. सुरक्षेचा आढावा घेऊन पोलीस बाहेर आले आहेत. मुंबई पोलिसांनी ही एक नित्याची प्रक्रिया असल्याचे म्हटले असले तरी. मुंबई पोलिसांची एक टीम लवकरच पंजाबला जाणार आहे, जिथे ते सलमान खान (salman khan) प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

सलमान खानचे वडील सलीम खान (salim khan) यांना पार्कमध्ये एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये लिहिले होते की, तुमची हालत देखील मूसेवालासारखी होईल. या घटनेनंतर सलमान खानच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आली होती. त्यानंतर बातमी आली की, सलमान खानच्या घराची रेकी करण्यात आली असली तरी पोलिसांनी त्या व्यक्तीला अटक केली आहे.

रेकी करणाऱ्या व्यक्तीची पोलिस सतत चौकशी करत आहेत. पंजाब पोलिसांचे डीजीपी गौरव यादव यांनी माहिती दिली आहे की, कपिल पंडित नावाच्या व्यक्तीने सांगितले की, लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरून सचिन बिश्नोई आणि संतोष यादव यांच्यासोबत त्याने सलमान खानच्या घराची रेकी केली.

29 मे रोजी पंजाबमधील मानसा जिल्ह्यात सिद्धू मुसेवाला या नावाने प्रसिद्ध असलेला पंजाबी गायक शुभदीप सिंग सिद्धू याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. गायकाच्या हत्येनंतर सलमान खानलाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची सुरक्षा वाढवली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अवॉर्ड फंक्शनमध्ये रणवीरसिंगचा जलवा! अल्लू अर्जुन, यशसोबत घातला धुमाकूळ
तब्बल चार वेळा लग्न करून ‘ही’ अभिनेत्री आलेली चर्चेत, सध्या पाकिस्तानमध्ये ‘असे’ काढते आयुष्य
‘ब्रह्मास्त्र’चे दोन दिवसाचे कलेक्शन पाहून बरळली कंगना; म्हणाली, ‘मला करणचा इंटरव्यू घ्यायचा आहे’

हे देखील वाचा