भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. कोरोना साथीविरूद्धच्या लढाईत मदत करण्यासाठी विराट कोहली, आणि पत्नी अनुष्का शर्मा यांनी दोन कोटी रुपयांचे दान दिले आहे. सात कोटी रुपये, उभे करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. दोघे हे पैसे केटो या संस्थेमार्फत गोळा करत आहेत, जे सर्वसामान्यांकडून निधी गोळा करतात. दोघांनीही त्यांच्या चाहत्यांना, त्यांच्या मोहिमेचे समर्थन करण्याचे आवाहन केले आहे. विराट कोहलीने ट्विटरवरुन ही माहिती दिली.
विराट आणि अनुष्का यांच्यामार्फत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “कोरोना रिलीफ फंडासाठी, विराट कोहली आणि बॉलिवूड सुपरस्टार अनुष्का शर्मा यांचे लक्ष्य सात कोटी रुपये आहे.” यात असे म्हटले आहे की, “ते लोकांकडून पैसे घेऊन, सामाजिक कार्यासाठी केटोमार्फत मोहिम सुरू करत आहेत, आणि त्यांनी दोन कोटी रुपये, त्यांच्याकडून दान केले आहेत.” ही मोहीम केटोद्वारे सात दिवस चालणार आहे. यामधून मिळवलेला निधी, ऑक्सिजन आणि इतर वैद्यकीय संबंधित सुविधा उपलब्ध करण्यासाठी, एसीटी ग्रँट्स नावाच्या संस्थेला दिला जाईल.
विराट म्हणाला, “आपला देश या क्षणी कठीण अवस्थेतून जात आहे. आपल्या देशाला आपल्या सर्वांना एकत्र करण्याची, आणि अधिकाधिक लोकांचे जीवन वाचवण्याची गरज आहे. गेल्या एका वर्षापासून, लोकांना होणारा त्रास पाहून मी, आणि अनुष्का दुखावलो आहेत.” तो म्हणाला की, त्याने आणि त्यांच्या पत्नीने व्हायरसविरूद्धच्या युद्धात अधिकाधिक लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Anushka and I have started a campaign on @ketto, to raise funds for Covid-19 relief, and we would be grateful for your support.
Let’s all come together and help those around us in need of our support.
I urge you all to join our movement.
Link in Bio! ????#InThisTogether pic.twitter.com/RjpbOP2i4G
— Virat Kohli (@imVkohli) May 7, 2021
पुढे बोलताना ते म्हणाले, “आम्ही अधिकाधिक लोकांना मदत करण्याच्या दिशेने काम करत आहोत. भारताला आत्ताच आपल्या सर्वात मदतीची आवश्यकता आहे. आम्ही या विश्वासाने निधी उभारण्याचे वचन दिले आहे.”
अनुष्काने १ मे रोजी आपला वाढदिवस साजरा केला नाही. अनुष्काने सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याबद्दल, चाहत्यांचे आभार मानले आणि एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ते म्हणाले की, या कठीण काळात जेव्हा देश कोरोना संकटात सापडला आहे, तेव्हा माझा वाढदिवस साजरा करणे योग्य नाही. व्हिडिओमध्ये अनुष्कानेही तिच्या चाहत्यांना एकत्र येण्याचे आणि या संकटावेळी पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-चित्रपटांपासून दूर असलेली अभिनेत्री करतेय शेती, पाहा आंब्याच्या बागेतील जुही चावलाचे व्हायरल फोटो