Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘बच्चन हे आडनाव कोणत्याही…’, म्हणत अमिताभ बच्चन यांनी सांगितली आडनावाच्या मागची खरी गोष्ट

‘बच्चन हे आडनाव कोणत्याही…’, म्हणत अमिताभ बच्चन यांनी सांगितली आडनावाच्या मागची खरी गोष्ट

अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपट क्षेत्रातील महान व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. दमदार अभिनयामुळे प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या बच्चन कुटुंबियांचा इंडस्ट्रीमध्ये मोठा दबदबा आहे. अमिताभ यांनी अलीकडेच ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमात त्यांनी त्यांना ‘बच्चन’ हे आडनाव कसे मिळाले याची रंजक गोष्ट सांगितली आहे. काय आहे बच्चन आडनावामागचा इतिहास चला जाणून घेऊ.

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाच्या जादूने आणि खुमासदार सूत्रसंचालनाने ‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. समोर बसलेल्या स्पर्धकासोबत गप्पा मारताना कार्यक्रमात अमिताभ बच्चन सुद्धा त्यांच्या आयुष्यातील अनेक मजेदार गोष्टी प्रेक्षकांना सांगत असतात ज्यामुळे कार्यक्रमाची रंगत आणखी वाढत जाते. अलीकडच्याच एका भागात अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ‘बच्चन’ आडनावासंबधी एक रंजक किस्सा प्रेक्षकांना सांगितला, ज्यामुळे प्रेक्षकही चकित झाले.

‘कौन बनेगा करोडपती’ कार्यक्रमात हॉटसीटवर भाग्यश्री नावाच्या स्पर्धक बसल्या होत्या. बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांना त्यांच्या लवस्टोरी बद्दल विचारले तेव्हा भाग्यश्री म्हणाल्या की, त्यांचा प्रेमविवाह झाला आहे. जात वेगळी असल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. ज्यावेळी त्यांनी त्यांच्या घरच्यांना हे सांगितले तेव्हा जात वेगळी असल्याने त्यांनी या लग्नाला विरोध केला. त्यानंतर समजूत घालत त्यांनी घरच्यांची परवानगी घेतली. एका वर्षापूर्वी त्यांच्या घरच्यांनी त्यांचा विवाह लावून दिला मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवसानंतर त्यांनी भाग्यश्री आणि त्यांच्या पतीसोबत सगळे संबंध तोडले. हे सांगताना भाग्यश्री खूपच भावूक झाल्या होत्या.

त्यांची कहाणी ऐकून अमिताभ बच्चन यांनी कार्यक्रमातून हात जोडत भाग्यश्रीच्या वडिलांना त्यांच्या या लग्नाचा मोठ्या मनाने स्विकार करण्याची विनंती केली. यावेळी अमिताभ यांनी त्यांच्या आई वडिलांबद्दल सांगितले. त्यांचे आई वडील सुद्धा वेगवेगळ्या जातीचे होते असे ते म्हणाले.

याबद्दल बोलताना अमिताभ बच्चन म्हणाले की, “त्यांची आई तेजी बच्चन या शीख धर्माच्या होत्या. तर वडील उत्तर प्रदेशमधील कायस्थ परिवारातुन होते. माझ्या आई वडिलांना सुद्धा लग्न करताना विरोधाचा सामना करावा लागला. परंतु नंतर सगळ्यांनी परवानगी दिली. ही १९४२ मधील गोष्ट आहे. मला आश्चर्य वाटते की लोक आजही अशा जुन्या गोष्टींवर विश्वास ठेवतात.”

अमिताभ यांनी पुढे सांगितले की, “माझ्या वडिलांनी मुद्दाम ‘बच्चन’ हे आडनाव लावले होते. कारण बच्चन हे आडनाव कोणत्या जाती धर्माचा पुरस्कार करीत नाही. त्यांनी सांगितले की ज्यावेळी त्यांचे आई वडील त्यांना शाळेत नाव नोंदवायला घेऊन गेले तेव्हा तिथे आडनाव विचारण्यात आले त्यावेळी त्यांच्या वडिलांनी आडनाव न सांगता त्यांचे दुसरे टोपणनाव सांगितले होते.”

बच्चन हे नाव अमिताभ बच्चन यांचे वडील त्यांच्या कवितांसाठी वापरायचे. आज ‘बच्चन’ हे नाव ब्रँड बनले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-खुश खबर! नागा चैतन्यसोबत घटस्फोटानंतर, दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर समंथाने दिली आनंदाची बातमी

-आर्यन खानने जेलमध्ये एनसीबी संचालक समीर वानखेडेंना दिले ‘हे’ वचन; ऐकून शाहरुखलाही वाटेल अभिमान

-नागा चैतन्यपासून घटस्फोट घेतल्यानंतर समंथाचे करिअरवर लक्ष; हिंदी चित्रपटाव्यतिरिक्त साईन केले अनेक प्रोजेक्ट्स

हे देखील वाचा