Saturday, April 20, 2024

ठरल तर! राणादा पाठक बाईंनी लग्नासाठी निवडले ‘हे’ ठिकाण, हार्दिक जोशीने लग्नाबद्दल केला महत्वाचा खुलासा

मराठी टेलिव्हिजनवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ ही मालिका प्रचंड गाजली होती. मालिकेच्या कथेला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळाला होता. मालिकेत राणादा आणि पाठक बाईंची सुंदर लवस्टोरी दाखवण्यात आली होती ज्यामधील दोघांच्या केमिस्ट्रीचे प्रेक्षकांनी जोरदार कौतुक केले होते. मालिकेत राणाच्या भूमिकेत हार्दिक जोशी (Hardik Joshi) तर अंजली म्हणजेच पाठक बाईंच्या भूमिकेत अक्षया देवधरने (Akshaya Deodhar) भूमिका साकारली होती. काही दिवसांपूर्वीच दोघांनीही  साखरपुडा करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. आता त्यांच्या लग्नाबद्दलही अनेक खुलासे केले आहेत.

राणा दा आणि पाठक बाई म्हणजेच तुझ्यात जीव रंगला मालिकेतील हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने साखरपुडा उरकत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. तुझ्यात जीव रंगला मालिकेच्या सेटवर झालेली त्यांची ही मैत्री आता लग्नापर्यंत येऊन पोहोचली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. साखरपुड्यानंतर राणा आणि अंजलीच्या लग्नाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ज्याबद्दलचा खुलासा अलिकडेच त्यांनी केला आहे.

नुकतेच हार्दिक जोशी आणि अक्षया देवधरने चला हवा येऊ द्या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात यावेळी दोघांनीही मनसोक्त गप्पा मारल्या. मालिकेच्या सेटवरच आमच्या दोघांची लवस्टोरी रंगली त्यामुळेच कोल्हापूरच्या खूप आठवणी जोडल्या गेल्या आहेत. या सुंदर आठवणींमुळेच आम्ही दोघांनीही साखरपुड्याला कोल्हापूरवरुन कपडे मागवले होते असा खुलासा हार्दिक जोशीने केला.  त्याचबरोबर लग्नाच्या तयारीबद्दल सांगताना राणादाने पुण्यातच लग्न करणार असल्याचेही सांगून टाकले आहे. आमची पुण्यातच लग्न करण्याची इच्छा आहे. याबद्दलची चौकशीही आम्ही शिवानी आणि विराजस कुलकर्णी यांच्याकडे केल्याचे यावेळी राणादाने सांगितले.

https://www.instagram.com/reel/Ce-rHg1oH9B/?utm_source=ig_web_copy_link

दरम्यान अंजलीची कोणती गोष्ट तुला आवडत नाही असा प्रश्नही राणादाला यावेळी विचारण्यात आला. याबद्दल बोलताना राणादाने ती माझी बायको होणार असली तरी आमचे मैत्रीचे नाते मात्र कायम असेच राहणार आहे. तिच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट मला माहित आहे. कोणत्या प्रसंगाला ती काय प्रतिक्रिया देईल हे सुद्धा मला नेमके माहित असते असे सांगतानाच राणादाने तिलाव राग लवकर येतो मग त्यावेळी ती काहीही बाेलते ही सवय तिने बदलावी अशी इच्छा बोलून दाखवली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा