Friday, March 29, 2024

‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेला अलविदा केल्यानंतर शिवांगीची भावुक पोस्ट; म्हणाली, ‘ये रिश्ता…’

चित्रपटसृष्टीतील कलाकारांप्रमाणेच छोट्या पडद्यावरील कलाकारही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. ते आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सोशल मीडियावर शेअर करत असतात. टीव्हीवरील ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ या मालिकेत नायरा आणि कार्तिकची भूमिका साकारणारे शिवांगी जोशी आणि मोहसीन खान हे दोघे गेल्या पाच वर्षांपासून चाहत्यांशी जोडलेले आहेत. त्यांनी चाहत्यांच्या मनात विशेष स्थान बनवले आहे. नायराच्या मृत्यूनंतर ती परत सीरतच्या भूमिकेत दिसली होती आणि तिने याची शूटिंग दोन वर्षापूर्वी केली असून तिने आता शोला अलविदा केला आहे. तसेच मोहसीनने हा शो आधीच सोडला होता. अशातच शिवांगीने एक सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

तिने दोन दिवसानंतर सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे आपल्या भावना शेअर केल्या आहेत. तिच्या इतक्या वर्षाच्या प्रवासाबद्दल तिने अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी पहिल्यांदाच माझ्या भावना शेअर करत आहे. तो दिवस असा होता की, मी खूप रडले. इच्छा असतानाही माझे रडणे थांबबू शकले नाही. आयुष्यात अशी वेळ येते की, तुम्ही नवीन लोकांना भेटता आणि ते तुमच्या आयुष्यावर आणि मनावर कायमचा प्रभाव टाकतात. तसेच माझ्या आयुष्यात तो क्षण मे २०१६ मध्ये आला जेव्हा मी पहिल्यांदा ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ च्या सेटवर आले होते. मला माहित नव्हते की, सेट माझे दुसरे घर होईल आणि ज्या लोकांना मी ओळखत देखील नाही, असे लोक माझे कुटुंब बनतील.”

तसेच तिने पुढे लिहिले की, “जवळ जवळ सहा वर्षे मी या टीमसोबत काम केले होते. मग मी अभिमानाने म्हणू शकते की ‘ये रिश्ता बहुत कुछ कहलाता है’. हा शो फक्त शो नसून माझे घर, माझे आयुष्य आहे. तिथे मी रडले, हसले, सेटवर लहान मुलांसोबत खेळले, सोबत जेवले, कधी चांगला शॉट नाही दिला की दिग्दर्शकाचे बोलणे खाणे, तर कधी चांगला शॉट दिला तर संपूर्ण टीम माझे कौतुक करत होते. या गोष्टी मी कधीही विसरणार नाही.”

“जेव्हा दोन दिवसाआधी मी सेट सोडत होते, तेव्हा मला असे वाटत होते की, मी कायमचे चालले आहे आणि शोमधील सगळे कलाकार मला बाय- बाय करत रडत होते,” असेही ती पुढे म्हणाली. नंतर तिने राजन शाहीचे आभार मानत लिहिले की, “धन्यवाद माझ्यावर एवढा विश्वास दाखवला, मला एवढी मोठी संधी दिल्याबद्दल. मोहसीन इतका चांगला सहअभिनेता असल्याबद्दल धन्यवाद. या शोला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले त्यांचेही आभार मानले. तसेच ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ चा माझा प्रवास तुमच्याशिवाय हा पूर्णपणे अपूर्ण आहे.”

शिवांगीची ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. चाहते तिच्या या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यंदा कर्तव्य आहे! रणबीर आणि आलिया अडकणार लग्नबंधनात; इटलीत घेणार सात फेरे?

-अभिनेत्री नेहा शर्माच्या फोटोसोबत करण्यात आली होती अश्लील छेडछाड, तिनेही फोटो शेअर करत घेतला समाचार

-अंदमानातील सेल्युलर जेलला भेट देताना स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल गौरवोद्गार काढत कंगना म्हणाली…

हे देखील वाचा