Saturday, July 27, 2024

मीना कुमारीच्या निधनानंतर शोक व्यक्त करण्याऐवजी नर्गिसने दिल्या होत्या शुभेच्छा, वाचा दोन मैत्रिणींचा न ऐकलेला किस्सा

अभिनेत्री मीना कुमारी (Meena Kumari) आणि नर्गिस दत्त (nargis) या दोघीही त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहेत. 70 च्या दशकात त्यांच्या अभिनयाने सर्वांनाच वेड लावले होते. त्यामुळेच सिने जगतातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींच्या यादीत या दोन्ही नावांचा समावेश आहे. दोघेही आज या जगात नसतील, पण त्यांचे चित्रपट आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. दोघींंमध्ये घट्ट मैत्रीचे नातेही होते परंतु की मीना कुमारी यांनी या जगाचा निरोप घेतला तेव्हा तिची खास मैत्रीण असलेल्या नर्गिसने शोक व्यक्त करण्याऐवजी तिला शुभेच्छा दिल्या होत्या. काय आहे हा किस्सा चला जाणून घेऊ.

अभिनेत्री मिना कुमारी यांनी आपल्या सोज्वळ सौंदर्याने सिने जगतात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. 1972 च्या दरम्यान मीना कुमारी यांनी जगाचा निरोप घेतला. नर्गिस दत्तही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेल्या होत्या त्यांचे अंतिम दर्शन. त्यावेळी नर्गिस यांनी मीना, तुला मरणाच्या शुभेच्छा देत आहे असा धक्कादायक संदेश दिला होता. यानंतर नर्गिस यांनी मीना कुमारीसाठी लिहिलेले एक पत्र उर्दू मासिकातही छापण्यात आले.

त्यांनी पत्राच्या सुरुवातीला लिहिले होते की, “तुझ्या मृत्यूबद्दल अभिनंदन, मी हे यापूर्वी कधीही बोलले नाही. मीना, आज तुझी मोठी बहीण तुझ्या मृत्यूबद्दल तुझे अभिनंदन करते आणि तुला पुन्हा या जगात पाऊल ठेवू नकोस असे सांगते. हे ठिकाण तुमच्यासारख्या लोकांसाठी नाही. त्यांच्या नात्याची आठवण करून देताना नर्गिसने लिहिले की, ‘शूटिंगदरम्यान माझे पती सुनील दत्त यांनी मला मुलांसोबत सेटवर बोलावले. तिथे माझीआणि मीना खूप चांगली मैत्री झाली. एकदा मी दत्तसाहेबांसोबत जेवायला गेले असताना मीनाने स्वखुशीने संजय आणि नम्रता यांची काळजी घेतली, तसेच कपडे बदलून त्यांच्यासाठी दूध बनवले.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, “एका रात्री तिने मीना कुमारीला हॉटेलच्या बागेत फिरताना पाहिले. ती अस्वस्थ होती आणि जेव्हा नर्गिसने कारण विचारले तेव्हा मीना कुमारी म्हणाली, “बाजी, मी कधी-कधी तंबाखू खाते त्यामुळे घाबरते.” हे ऐकून नर्गिस म्हणाली, “मीना, तंबाखूमुळे नाही. तू खूप थकलेली दिसत आहेस. तू थोडा वेळ आराम का करत नाहीस?” हे ऐकून मीना कुमारी यांनी “बाजी, माझ्या नशिबात आराम नाही. मी फक्त एकदाच विश्रांती घेईन” असे उत्तर दिले होते. (when nargis dutt said meena kumari maut mubarak ho on her demise)

दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘असं’ काय झालं होतं? ज्यामुळे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना भरसभेत मागावी लागली होती मीना कुमारींची माफी!

‘आदिपुरुषला बॉयकॉट करा’ म्हणत नेटकऱ्यांनी चित्रपटाच्या नव्या पोस्टरवरील ‘त्या’ चुकीवर घेतला आक्षेप

हे देखील वाचा