Thursday, June 12, 2025
Home कॅलेंडर ‘माझ्या कुत्र्यालाही चित्रपटाची ऑफर मान्य नाही…’, जेव्हा राज कुमार यांनी नाकारली होती प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर

‘माझ्या कुत्र्यालाही चित्रपटाची ऑफर मान्य नाही…’, जेव्हा राज कुमार यांनी नाकारली होती प्रसिद्ध दिग्दर्शकाची ऑफर

हिंदी सिनेमात एकापेक्षा एक अभिनेते आहेत, ज्यांनी आपल्या दमदार अभिनयानेच नव्हे, तर आपल्या खास अंदाजाने देखील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. असेच एक सुपरस्टार होते राज कुमार. जसे नाव तसाच स्वभाव, ते खरोखरच एका राज कुमारासारखे जगायचे. राज कुमार यांनी अनेक हिट चित्रपटांसोबतच अनेक असे डायलॉग दिले, जे अजूनही प्रेक्षकांच्या जिभेवर आहेत. “जानी, हम तुम्हे मारेंगे और जरूर मारेंगे. लेकिन वो बंदूक भी हमारी होगी, गोली भी हमारी होगी और वक्त भी हमारा होगा.” असे अनेक हिट डायलॉग देणारे राज कुमार, खऱ्या आयुष्यात देखील रुबाबदार होते. आज आम्ही असा किस्सा सांगणार आहोत, जो ऐकून तुम्हाला राज कुमार यांच्या स्वभावाचा अंदाज लागेल.

किस्सा तेव्हाचा आहे, जेव्हा राज कुमार यांचे काही चित्रपट सरासरी व्यवसाय करत होते. पण त्याच्या मनःस्थितीत कोणताही बदल झाला नाही. एक दिवस त्यांचे मित्र आणि दिग्दर्शक रामानंद सागर त्यांच्या घरी भेटायला आले होते. रामानंद यांनी अभिनेत्याला एका चित्रपटाचा प्रस्ताव दिला होता, यासाठी त्यांनी नकार दिला. यानंतर राज कुमारांचे आलेले चित्रपट, जसे की ‘इंसानियात के देवता’ आणि ‘पुलिस और आणि मुजरिम’ हेदेखील काही खास कामगिरी करू शकले नाहीत.

खरं तर, रामानंद सागर आणि राज कुमार यांच्यात चांगली मैत्री होती आणि अभिनेत्याने रामानंदच्या ‘जिंदगी’ आणि ‘पैगाम’ सारख्या चित्रपटांमध्ये काम देखील केले होते. राज कुमारांनी त्यांच्या घरात रामानंदचा चांगला पाहुणचार केला. यानंतर रामानंद सागर राज कुमारांना त्यांच्या ‘आंखें’ चित्रपटात मुख्य भूमिकेत साईन करण्याबद्दल बोलले.

रामानंद राज कुमारांना म्हणाले की, “माझ्या ‘आंखें’ चित्रपटात तू मुख्य भूमिका करावी, अशी माझी इच्छा आहे आणि त्यासाठी मी तुला दहा लाख रुपये देईन.” या सर्व गोष्टी रामानंद घरातूनच ठरवून आले होते. हे दोघेही त्यावेळी राज कुमारांच्या सजलेल्या ड्रॉईंग रूममध्ये बसले होते आणि त्यावेळी अभिनेता सिगारेट पीत होते. रामानंदचा प्रस्ताव ऐकून राज कुमार काही क्षण शांत राहिले आणि विचार करत राहिले. दिग्दर्शकालाही खात्री होती की, राज कुमार त्यांचे मित्र आहेत आणि त्यांना नाकारणार नाहीत. काही क्षण शांत राहिल्यानंतर राज कुमारांनी, ड्रॉईंगरुमजवळ चालत असलेल्या त्यांच्या कुत्र्याला आवाज दिला. कुत्रा राज कुमारांच्या पायाजवळ बसला.

ते त्याच पद्धतीने सिगार पित कुत्र्याला म्हणाले की, “जानी, तुला वाटते आपण सागरची ऑफर स्वीकारावी की नाही?” कुत्रा काही क्षण राज कुमारकडे टक लावून बघत बसला आणि नंतर मान हलवून भुंकू लागला. रामानंद सागर आश्चर्यचकित झाले की, राज कुमार हे काय करत आहेत. कुत्रा भुंकल्यानंतर राज कुमार रामानंदकडे वळून म्हणाले, “पाहा सागर जी, तुमची ऑफर माझ्या कुत्र्यालासुद्धा मान्य नाहीत, म्हणून मी हो म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”

हे ऐकून रामानंद यांना फारच अपमानित झाल्यासारखे वाटले. परंतु ते काहीच करू शकत नव्हते, कारण राजकुमार याच स्वभावामुळे संपूर्ण उद्योगात प्रसिद्ध होते. रामानंद काही न बोलता, बारीक तोंडाने परत आले. परतल्यानंतर लगेचच त्यांनी धर्मेंद्र यांना चित्रपटासाठी साईन केले आणि चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली.

‘आंखें’ हा चित्रपट रिलीझ झाला आणि तो सुपरहिटही ठरला. या चित्रपटाने धर्मेंद्र यांना सुपरस्टारच्या श्रेणीत आणले. साहजिकच, रामानंद यांनी हिट चित्रपट देऊन, राज कुमारांशी आपल्या अपमानाचा बदला घेतला होता. पण आश्चर्य म्हणजे, राज कुमारांनी त्यांच्या वागण्याबद्दल कधीही खंत व्यक्त केली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा