Friday, July 5, 2024

जेव्हा 45 वर्षांपूर्वी रेखा यांच्या ‘त्या’ कृत्यामुळे चिडायचे अमिताभ बच्चन, कारण जाणून तुम्हीही हादराल

बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) यांनी ज्या चित्रपटात पहिल्यांदा काम केले होते, त्या चित्रपटाच्या प्रदर्शनाला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा चित्रपट त्यांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचे नाव ‘दो अनजाने’ (Do Anjaane) असून, हा चित्रपट 26 नोव्हेंबर, 1976 रोजी प्रदर्शित झाला होता. दुलाल गुहा दिग्दर्शित या चित्रपटात अमिताभ-रेखा यांच्याव्यतिरिक्त प्रेम चोप्रा (Prem Chopra), उत्पल दत्त, ललिता पवार, प्रदीप कुमार आणि मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांचा कॅमिओ होता. या चित्रपटात रेखा आणि अमिताभ अनोळखी होते. मात्र, शूटिंग सेटवर दोघांमध्ये अशी काही केमिस्ट्री पाहायला मिळाली की, प्रेक्षकांना ही जोडी आवडू लागली.

अमिताभ यांना भेटल्यानंतर बदलला रेखा यांचा दृष्टिकोन
रेखा-अमिताभ अनेक वर्षांपासून एकत्र काम करत नसले, तरी त्यांची नावे नेहमीच एकमेकांशी जोडली जातात. असे म्हणतात की, त्यांचे नाते असे आहे की, ते डोळ्यांनी एकमेकांचे हाल समजून घ्यायचे. ‘दो अनजाने’ चित्रपटाच्या सेटवर भेटल्यानंतर त्यांचे नाव आयुष्यभर जोडले जाईल, हेही त्यांना माहित नव्हते, पण पहिल्या चित्रपटात दोघे एकमेकांसोबत कम्फर्टेबल होते असे नाही.

रेखा यांनी सिमी ग्रेवालच्या शोमध्ये सांगितले होते की, “’दो अनजाने’च्या शूटिंगच्या वेळी मी सीनियर होते, पण ‘दीवार’च्या जबरदस्त यशानंतर अमिताभ यांचे नाव फिल्म इंडस्ट्रीत गाजले. त्यांच्या यशाचा असा काही परिणाम झाला की, अमिताभ यांना सेटवर पाहून मी इतकी घाबरून जायचे की, मी माझे डायलॉग विसरायचे.” रेखा, अमिताभ यांच्या व्यक्तिमत्त्वाने खूप प्रभावित झाल्या होत्या. त्या म्हणाल्या होत्या की, “मला अमिताभ यांच्यासारखा माणूस कधीच भेटला नाही, त्यांच्यात अनेक गुण आहेत. अमिताभ यांना भेटल्यानंतर माझा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलला होता.”

रेखा यांच्या कृत्यामुळे चिडायचे अमिताभ बच्चन
त्याचवेळी लेखक-पत्रकार यासिर उस्मान यांच्या ‘रेखा: द अनटोल्ड स्टोरी’ या पुस्तकात रेखा ‘दो अनजाने’च्या सेटवर वेळेवर आल्या नाही, असे लिहिले आहे. यामुळे अमिताभ चिडायचे. एके दिवशी त्यांनी रेखा यांना वेळेवर सेटवर येण्यास सांगितले आणि त्याचे शूटिंग गांभीर्याने घेण्यास सांगितले. अमिताभ असे काही बोलले की, रेखा यांनी त्यांचा मुद्दा मान्य केला. रेखा यांना अमिताभ यांची कामाची आवड आणि त्यांची वागणूक इतकी आवडली की, त्या अमिताभ यांच्या चांगल्या मैत्रीण झाल्या.

रेखा यांच्यासोबतच्या नात्यावर अमिताभ यांनी केला होता खुलासा
त्यांच्या मैत्रीच्या चर्चा कमी, मात्र अफेअरच्या चर्चा खूप होत्या. विवाहित अमिताभ यांचे नाव रेखा यांच्यासोबत अशाप्रकारे जोडले गेले आहे की, कित्येकदा सत्य सांगूनही आजही त्यांच्या नात्याची चर्चा आहे. रेखा यांच्या प्रकरणावर अमिताभ जरी मौन बाळगून असले, तरी एकदा सिमी ग्रेवालच्या शोमध्ये ते त्यांच्या नात्यावर खुलेपणाने बोलले होते. सिमीने अमिताभ यांना एका मुलाखतीदरम्यान विचारले होते की, रेखा यांच्याबद्दलच्या अफवा त्यांना त्रास देतात का. ही 1998 ची गोष्ट आहे.

रेखा आणि अमिताभ यांनी अनेक चित्रपटात काम केले आहे. त्यामध्ये ‘सिलसिला’, ‘मिस्टर नटवरलाल’, ‘गंगा की सौगंध’, ‘अलाप’, ‘मुक्कदर का सिकंदर’, ‘खून पसीना’, ‘सुहाग’, ‘नमक हराम’ यांसाख्या चित्रपटांचा समावेश आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही नक्की वाचा-
नॅशनल क्रश बनली ‘जलपरी’,आवर्जून पाहा फाेटाे
रक्षा अन् कल्लूच्या व्हिडिओनं वेधलं सगळ्याचं लक्ष; अभिनेत्री म्हणाली, ‘सइयां के राखब साडी…’

हे देखील वाचा