Wednesday, April 17, 2024

थिएटरमध्ये झाली अनुपम खेर आणि किरण खेरची मैत्री, पुढे आयुष्यभरासाठी बांधली रेशीमगाठ

अनुपम खेर आणि किरण खेर हे बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत. दोघेही चित्रपटसृष्टीतील नावाजलेले आहेत. किरण खेर अभिनयासोबतच राजकारणातही सक्रिय आहेत. ते चंदीगडचे खासदार आहेत. आज या सुंदर जोडप्याच्या लग्नाचा वाढदिवस आहे. होय, 38 वर्षांपूर्वी याच दिवशी म्हणजे 26ऑगस्टला अनुपम खेर आणि किरण खेर यांचा विवाह झाला होता. पण लग्न करण्याचा निर्णय दोघांसाठी सोपा नव्हता. चला जाणून घेऊया, त्यांची प्रेमकहाणी कशी सुरू झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय कसा घेतला.

अनुपम खेर(Anupam Kher) आणि किरण खेर(Kiran kher) सुरुवातीला खूप चांगले मित्र होते. मात्र, दोघांमध्ये प्रेमसंबंध नव्हते. किरण खेर चंदिगडमधील थिएटर ग्रुपशी संबंधित होते, त्याच ग्रुपमध्ये अनुपम खेर देखील होते. दोघांनी अनेक नाटकांमध्ये एकत्र काम केले. कदाचित तोपर्यंत त्या दोघांनाही माहीत नसावे की, ते भविष्यात पती-पत्नी बनतील, कारण दोघांचे आधीच लग्न झाले होते. अनुपम खेर यांनी १९७९ मध्ये अरेंज मॅरेज केले होते, पण ते या नात्यात खुश नव्हते. किरणने 1980 मध्ये मुंबईतील उद्योगपती गौतम बेरीशी लग्न केले होते, जे फक्त पाच वर्षे टिकले.

चंदीगडनंतर किरण खेर आणि अनुपम खेर दोघेही मुंबईत संघर्ष करत होते. दरम्यान, असा एक क्षण आला, जेव्हा त्यांना प्रेम वाटले. अशा परिस्थितीत दोघांनी जोखमीचा निर्णय घेतला. अनुपम खेर यांचा त्यांच्या पत्नीपासून घटस्फोट झाला होता. यानंतर किरण खेर आणि त्यांच्या पतीलाही समजले की आता त्यांचे लग्न चालणार नाही आणि दोघांनी घटस्फोट घेतला. यानंतर 1985 मध्ये याच दिवशी किरणने अनुपमसोबत लग्न केले. पहिल्या पतीपासून घटस्फोटाबाबत किरण म्हणाली होती, ‘पहिल्या लग्नात प्रेम उरले नव्हते, त्यामुळे वेगळे होण्याचा निर्णय घेतला.’ किरणला पहिल्या लग्नापासून एक मुलगा आहे, त्याचे नाव सिकंदर आहे.

प्रत्येक हसऱ्या चेहर्‍यामागे काही ना काही वेदना दडलेली असते, असं अनेकदा म्हटलं जातं. हे किरण खेर यांच्याबाबतीत खरे ठरते. अयशस्वी विवाहातून बाहेर पडून तिला अनुपम खेर यांचा आधार मिळाला. आयुष्य पुन्हा रुळावर आले. पण सामान्य कुटुंबाप्रमाणेच त्यांच्या कुटुंबावरही संकट आले. त्यामुळे तिच्या दुसऱ्या पतीला म्हणजेच अनुपम खेरला आर्थिक फटका बसला. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. या दरम्यान किरण खेर कुटुंबाची परिस्थिती हाताळण्यासाठी पुढे आली आणि कुटुंबाच्या बाजूने उभी राहिली.

चित्रपटांमध्ये परतले आणि त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले. कुटुंबात पुन्हा आनंद परत आला. किरण खेर यांनी केवळ सिनेमापासून राजकारणापर्यंत संघर्ष केला नाही, तर त्या हरणाऱ्यांपैकी नाही हेही सांगितले. मात्र, त्यांचे इरादे जितके मजबूत आहेत, तितकेच आयुष्यही त्यांची परीक्षा घेत आहे. आयुष्याच्या या सर्वात यशस्वी टप्प्यावर येऊन ती आता कॅन्सरसारख्या आजाराशी झुंज देत आहे. किरण खेर यांना ब्लड कॅन्सर असल्याचे गेल्या वर्षी आढळून आले होते. त्यांचे पती अनुपम खेर यांनी ही माहिती दिली. त्यांची कॅन्सरशी लढाई अजूनही सुरूच आहे. कर्करोगावर मात करण्यात ती यशस्वी होईल, अशी आम्हाला मनापासून आशा आहे.

हेही वाचा-
कामाचे पैसे न मिळाल्याने संतापली गौतमी; थेट स्क्रिनशॉट शेअर करत म्हणाली, ‘स्वत:च्या पैशांसाठी…’
Breaking: बॉलिवूडला मोठा धक्का, ‘मैंने प्यार किया’ फेम ज्येष्ठ गीतकारांचे निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

हे देखील वाचा