शनिवारी (०२ ऑक्टोबर) मुंबईहून गोव्याच्या दिशेने चाललेल्या एका जहाजावर एनसीबीच्या पथकाची धाड पडली. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला देखील ताब्यात घेतले गेले आणि त्याला एनसीबी कोठडी झाली. त्यानंतर सोमवारी पुन्हा ७ ऑक्टोबरपर्यंत त्याची एनसीबी कोठडी वाढवण्यात आली होती. गुरुवारी (०८ ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीमध्ये आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी आणखीन नवीन खुलासे केले आहेत.
या वेळी मानेशिंदे यांनी पुन्हा आर्यनच्या जामिनाची मागणी केली. ते म्हणाले की, “आर्यनला त्या पार्टीमध्ये ‘ग्लॅमरचा तडका’ लावायला बोलावण्यात आले होते. अशा पार्टीमध्ये बॉलिवूडमधील अथवा अभिनयाशी संबंधित व्यक्तींना ग्लॅमर आणण्यासाठी बोलावले जाते.” या आधी देखील त्यांनी “आर्यन तिथे आयोजकापासून ते इतर आरोपींपर्यंत कुणालाच ओळखत नाही. त्याचा मित्र अरबाज मर्चंट याच्या आमंत्रणामुळे तो तिथे गेला होता,” असे सांगितले होते.
या सर्वांमध्ये एनसीबीकडून सातत्याने आर्यनला एसीबीच्या कोठडीत आणखीन काही दिवस ठेवण्यात यावे, अशी मागणी होत होती. परंतु यावेळी अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांनी एनसीबीची मागणी फेटाळत आर्यनला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
आर्यनच्या वकिलांनी सातत्याने त्याचा या सर्व प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे सांगितले आहे. परंतु तरी देखील आतंरराष्ट्रीय स्तरावरील या प्रकरणाशी संबंधीत आणखी पुरावे आणि सर्व धागेदोरे शोधण्यासाठी एनसीबीला आर्यन त्यांच्या अटकेत पाहिजे होता. या प्रकरणामध्ये नूपुर सतिजा, इश्मीत चड्ढा, मोहक जैस्वाल, गोमित चोप्रा आणि विक्रांत चोकर यांना देखील अटक करण्यात आली आहे.
आर्यन एनसीबी अधिकाऱ्यांना धाड टाकलेल्या जहाजावर सापडला नव्हता. तो त्यांना जहाजाच्या बाहेर काही अंतरावर सापडला होता. तसेच एनसीबीला त्याच्याकडे कोणतेही अं’मली पदार्थ सापडले नाहीत, पण त्याने अं’मली पदार्थांचे सेवन केले होते. त्यामुळेच त्याला जामीन मिळाला नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-मोठी घडामोड! एकीकडे जामीन अर्जावर सुनावणी सुरु असतानाच आर्यन खानची आर्थर रोड कारागृहात रवानगी
-काय सांगता? ज्याने आर्यन खानला ‘धरलं’ तोच निघाला फरार आरोपी, क्रूझ प्रकरणात नवा ट्विस्ट
-‘यामुळे’ देवोलीना भट्टाचार्जीवर भडकले सिद्धार्थ शुक्लाचे चाहते, स्पष्टीकरण देत अभिनेत्री म्हणाली…