Friday, April 19, 2024

फिरोज खानने जया बच्चन यांच्यावर केली अपमानास्पद टिप्पणी; म्हणाले, ‘नटगुल्ली पत्नी…’

बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार जया बच्चन (Jaya Bachchan) सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच त्यांनी संसदेत भाषण करताना नाराजी व्यक्त करत भाजपवर घणाघाती आरोप केले. इतकेच नाही, तर यावेळी त्यांनी भाजपच्या खासदारांना लवकरच त्यांचे वाईट दिवस येणार आहेत असा शापही दिला. याशिवाय, आदल्या दिवशी खासदार म्हणाले की, आगामी यूपी विधानसभा निवडणुकीच्या निकालाची भीती असल्याने भाजप विरोधकांवर सतत हल्ला करत आहे. भाजपवर हल्ला करताना, अभिनेत्रीने असेही म्हटले की “एखाद्या दिवशी फक्त लाल टोपी न्यायालयात खेचेल.”

त्याचवेळी, आता अभिनेत्रीच्या या विधानावर भाष्य करताना, प्रसिद्ध टीव्ही मालिका महाभारतमध्ये अर्जुनची भूमिका साकारणारा सुप्रसिद्ध अभिनेते फिरोज खान यांनी ट्विटरवर जया बच्चन यांच्या विरोधात असे काही लिहिले, ज्यामुळे ते सध्या वादात सापडले आहेत.

अभिनेत्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर केलेल्या ट्वीटमध्ये अभिनेत्री जया बच्चन यांच्याविरोधात अपमानास्पद शब्द वापरला होता. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिले की, “गेल्या ५० वर्षांत अमिताभ बच्चन यांनी जी इज्जत निर्माण केली होती, तो आदर त्यांच्या ‘नटगुल्ली’ पत्नीने नष्ट केला आहे.”

फिरोज खान यांनी मंगळवारी रात्री त्याच्या अकाऊंटवरून हे ट्वीट केले. खासदार या नात्याने जया बच्चन यांच्या संसदेतील भाषणासंदर्भात त्यांनी हे ट्वीट केले आहे. किंबहुना, सोमवारी संसदेत भाषण करताना जया बच्चन यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर सडकून टीका केली. पनामा पेपर्स प्रकरणी सोमवारी त्यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिची ईडीने चौकशी केल्यानंतर जया यांची प्रतिक्रिया आली.

त्याचवेळी फिरोज खानबद्दल सांगायचे तर, त्यांनी १९८४ साली ‘मंजिल’ या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. पण १९८८ मध्ये टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या ‘महाभारत’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून त्यांना ओळख मिळाली. या शोमध्ये फिरोज अर्जुनची भूमिका साकारताना दिसले होते.

याशिवाय ते ‘कयामत से कयामत तक’, ‘खतरों के खिलाडी’, ‘जिगर’, ‘तिरंगा’, ‘करण अर्जुन’, ‘साजन चले ससुराल’, ‘राजा की आयेगी बारात’ या बॉलिवूड चित्रपटांमध्येही दिसले आहेत. ‘मेहंदी’, ‘जोडी नंबर १’ आणि ‘यमला पगला दीवाना फिर से’ यामध्येही दिसले आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा