Sunday, July 12, 2026
Home बॉलीवूड चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या ‘चांदणी बार’ सिनेमाला २० वर्ष पूर्ण, तब्बूला समोर ठेऊनच तयार केला सिनेमा

चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या ‘चांदणी बार’ सिनेमाला २० वर्ष पूर्ण, तब्बूला समोर ठेऊनच तयार केला सिनेमा

सिनेसृष्टीमध्ये अनेक चित्रपट येतात आणि जातात. अशात काही चित्रपट खूप गाजतात, बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतात, तर काही चित्रपट फ्लॉप होतात. बॉलिवूडमध्ये सिनेसृष्टीमध्ये अनेक ज्वलंत विषयांवर देखील चित्रपट बनवले आहेत. अशात काही चित्रपटांच्या कथा इतक्या दमदार आहेत की, २० वर्ष होऊनही त्या चित्रपटांमधील पात्रे प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करून आहेत. अशाच काही हिट चित्रपटांमधील एक चित्रपट आहे ‘चांदनी बार’.

‘चांदनी बार’ या चित्रपटाला मंगळवारी ( २८ सप्टेंबर) २० वर्षे पूर्ण झाली. तब्बू अभिनित ‘चांदनी बार’चे दिग्दर्शन मधुर भंडारकर यांनी केले होते. या चित्रपटाला २० वर्ष पूर्ण होऊनही त्याची छाप अद्यापही प्रेक्षकांच्या मनामध्ये कायम आहे. पठडीबाहेरील चित्रपट करण्यामागे मधुर भंडारकरांचा हातखंडा आहे. ते नेहमीच प्रवाहाच्या विरोधात जाऊन विचार करून सिनेमे बनवतात. ‘चांदनी बार’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.

हा चित्रपट एका बार डान्सर असणाऱ्या मुलीच्या आयुष्यावर आधारित होता. चित्रपटाचे नाव ऐकूनच यामध्ये काय आहे हे लक्षात येते. हा चित्रपट बनवताना मधुर यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तसेच चित्रपटाच्या नावावरून देखील काही प्रमाणात वाद होण्याची शक्यता दिग्दर्शकांना वाटत होती. चित्रपटाला २० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने जाणून घेऊयात या चित्रपटाशी जोडलेल्या परंतु अद्याप समोर न आलेल्या काही गोष्टी.

‘चांदनी बार’ २८ सप्टेंबर २००१ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये तब्बू मुख्य भूमिकेत होती. यामध्ये संपूर्ण चित्रपटाचे बजेट फार कमी होते. दिग्दर्शक मधुर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “चित्रपटाचे बजेट करीनाच्या ‘हिरोईन’ चित्रपटातील ड्रेस पेक्षाही कमी होते. परंतु चित्रपट चांगला चालला. प्रेक्षकांनी त्याला खूप प्रेम दिले.”

निर्मात्यांनी या चित्रपटामध्ये एक आइटम सॉन्ग घ्यायला सांगितलं होतं, पण मधुर यांना ते पसंत नव्हतं त्यांना त्यांच्या हिशोबाने आणि वेगळ्या पद्धतीने हा चित्रपटात बनवायचा होता. या कारणामुळे त्यांच्यामध्ये थोडे मतभेद झाले होते.

मधूर यांना हा चित्रपट बनवण्यासाठी एका उत्तम कलाकाराची गरज होती. त्यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, “या चित्रपटासाठी मी ६ महिने अभिनेत्रीचा शोध घेतला. कारण याच्या नावावरूनच हा चित्रपट बी श्रेणीचा वाटत होता. खूप शोध घेऊन, पण मला पहिली आणि शेवटची तब्बूच आवडली. तसेच तिला देखील चित्रपटाची कथा फार आवडली आणि ती काम करण्यास तयार झाली. ती जर या सिनेमाला नाही म्हणाली असती, तर मला खूप वाईट वाटले असते.”
तब्बूने या चित्रपटातील पात्र खूप छान पद्धतीने साकारले. तिच्या या चित्रपटातील अभिनयाने प्रेक्षक भारावून गेले होते. या चित्रपटाने चार राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते.

 

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बॉलिवूडचे ‘हे’ मोठे सिनेमे ठरले नुसताच फुसका बार, कमाईतून बजेट वसूल करणे देखील झाले मुश्किल

बॉलिवूडच्या ‘या’ दिग्गज अभिनेत्रींनी लग्नानंतर त्यांच्या यशस्वी चित्रपटांच्या करिअरला ठोकला रामराम

प्रायव्हेट जेटमध्ये मांडी घालून बसलेल्या प्रियांका चोप्राचा फोटो व्हायरल, नेटकरी म्हणाले, ‘खरी देसी गर्ल’

हे देखील वाचा