मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक केदार शिंदे (kedar shinde) यांनी त्यांच्या कामाने आतापर्यंत चांगलेच नाव कमावले आहे. आजोबांचे नाव एवढे मोठे असून देखील त्यांनी कधीही त्या नावाचा वापर न करता स्वतः त्यांची ओळख निर्माण केली आहे. शाहीर साबळे हे केदार शिंदे यांचे आजोबा. शिवशेना पक्षाचे बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर साबळे यांची मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर साबळे यांचे एकमेकांच्या घरी नेहमीच येणे जाणे होत असल्याचे. नुकतेच रविवारी (१९ जून) रोजी शिवसेनेचं वर्धापन दिन साजरा झाला आहे.त्यानिमित्त सगल्या आठवणींना उजाळा देत केदार शिंदे एक पोस्ट शेअर केली. जी सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
केदार शिंदे यांनी त्यांच्या धिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बाळासाहेब ठाकरे आणि शाहीर साबळे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्यांनी कॅप्शन दिले आहे की, “आज शिवसेनेचा स्थापना दिवस…जून्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या…ठाकरेकाका ( बाळासाहेब ठाकरे ) यांच बाबांना भेटायला आमच्या घरी येणं…बाबांच मातोश्रीवर वरचेवर जाणं…फोनवरुनही सतत चर्चा करणं..महाराष्ट्रभर आमच्या गाडीने दोघांनीच केलेला दौरा…पश्चीम महाराष्ट्रातल्या त्या वेळच्या मोठमोठ्या नेत्यांच्या दहशतीला न जूमानता बाबांनी ठाकरेकाकांच्या ठीकठीकाणी भरवलेल्या सभा…शिवसेनेचा विचार ठामपणे तरुणांपुढे यावा म्हणून निर्माण केलेलं “आंधळं दळतयं ” मुक्तनाट्य…जागृत झालेल्या मराठी तरुणांनी परप्रांतीयांविरुध्द पेटवलेली पहीली दंगल…बाबांचे आणि ठाकरे काकांचे ट्याप होणारं फोन संभाषण…दंगलीनंतर एका प्रसीध्द इंग्रजी दैनीकाने बाबांचा भलामोठा फोटो वर्तमानपत्रात छापून ” बाळासाहेबांना गुमराह करणारा हाच तो रक्त पीपासू माणूस ” म्हणून केलेली बाबांची नीर्भत्सना.”
https://www.instagram.com/p/Ce-MX8ClMj-/?utm_source=ig_web_copy_link
त्यांनी पुढे लिहिले की, “शिवसेनेने राजकारणात पडू नये म्हणून बाबांनी केलेला आटापीटा…ऐशी टक्के समाजकारण आणि वीसटक्के राजकारण हे ब्रीद असलेल्या शिवसेनेच राजकारणातच सक्रीय होणं आणि बाबांच शिवसेनेपासून दूर होणं…आज हे सर्व आठवतय…शेवटपर्यंत शिवसेनेलाच मत देणारे बाबा आणि शेवटपर्यंत साबळे कुटूंबावर प्रेम करणारे ठाकरेकाकाही आठवतायत…पण खंत एकच आहे की शिवसेनेचा इतिहास लीहीला जाईल तेंव्हा त्यात बाबांच्या योगदानाचा उल्लेख नसेल…मात्र बाबांना श्रध्दाजली वाहाताना उध्दव ठाकरे याचा उल्लेख करायला विसरले नाहीत हे ही कमी नाही…आजही दोन्ही ठाकरे बंधूंनी आमच्या कुटुंबाबरोबर तसच स्नेहपुर्ण नात टिकवून ठेवलय…शिवसेना शतायु होवो…मराठी आणि शिवसेना हे समीकरण आबाधीत राहो…..
त्यांनी केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. अनेकजण या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
- Birthday Special | चित्रपटात चालला नाही राहुल खन्ना, परंतु सोशल मीडियाने दिली नवी ओळख
- जेव्हा बॉलिवूड निर्मात्याने केला होता शाहरुख खानचा अपमान म्हणाला, ‘तू बॉक्स ऑफिसवर चालणार नाहीस’
- कधी लग्न करणार जॅस्मिन भसीन आणि अली गोनी? अभिनेत्रीने सांगितला संपूर्ण प्लॅन