Wednesday, July 3, 2024

“लेकरांना घडवण्यासाठी आपल्याकडे…” मिलिंद गवळी यांची ‘ती’ मार्मिक पोस्ट झाली व्हायरल

आई कुठे काय करते या सुपरहिट मालिकेत नकारात्मक भूमिकेत दिसणारे अभिनेते मिलिंद गवळी यांना आता दुसऱ्या कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांनी त्यांच्या प्रतिभेने त्यांची एक वेगळी ओळख जपली आहे. आज मिलिंद गवळी नकारत्मक भूमिका साकारत असले तरी त्यांच्या असणारा एक सुजाण आणि विचारी व्यक्ती नेहमीच सोशल मीडियावर दिसत असतो. आपल्या विविध पोस्टमधून ते नेहमीच विविध विषयांवर व्यक्त होताना दिसतात. त्यांच्या पोस्ट देखील त्यांना लोकांमध्ये सतत चर्चेत ठेवत असतात.

आता पुन्हा एकदा मिलिंद यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी अतिशय महत्वाच्या विषयाबद्दल भाष्य केले आहे. मुलांना वाढवताना आई वडिलांना काय आधी करावे याबद्दल त्यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. मिलिंद गवळी यांनी ही पोस्ट त्यांच्या मित्रासाठी केली आहे. मात्र त्यातून जो संदेश त्यांनी दिला आहे, तो सगळ्यांसाठीच खूपच महत्वाचा आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)


मिलिंद यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, ““चला माणूस घडवूया”
एका वाघिणीचा छावा .
जसा जिजाऊचा शिवबा.
जो आपल्या मातृभूमीवर, आपल्या देशावर, देशातल्या गोरगरिबांवर, अबाल वृद्धांवर, लहान मुलांवर, जो असीम प्रेम करतो, तो म्हणजे माझा अतिशय जवळचा मित्र वसंत हंकारे,
वसंता हा सांगलीचा राजा आहे.
माझ्या वसंता सारखा वक्ता मी माझ्या उभ्या आयुष्यामध्ये कधीही पाहिलेला नाही, मी वसंताला दहा हजार शो त्यांसमोर चार चार तास बोलताना बघितलेला आहे, या वेळेमध्ये ऐकणाऱ्यांचं आयुष्य बदलताना मी बघितलेला आहे, श्रोत्यांना हसवण रडवणं आणि ते करत असताना पण त्याचं आणि प्रेरणेच कडू औषध त्यांच्या घरी उतरून हा वसंताचा हातखंडा आहे, त्याचं भाषण ऐकत असताना बाया माणसं लहान मुलं इतके बोट धरून धरून हसतात की त्यांच्या जन्मात कधी ते इतके प्रसन्न आणि आनंदी असे नसतील.
त्याचबरोबर ते रडतात पण इतके की आयुष्यभराचं सगळं दुःख ते बाहेर काढतात. आणि मग मोकळ्या मनाने नव्या आयुष्याची सुरुवात करतात.
कशाला प्रेरणा कशी द्यायची असते त्याला प्रोत्साहन कसं द्यायचं असतं त्याला मार्ग कसा दाखवायचा असतो हे वसंताला चांगलं माहिती आहे त्याने खूप मुलांची आयुष्य बदलली आहेत त्यांना योग्य तो मार्ग दाखवलेला आहे.
हे वसंताचं खूप मोठ समाज कार्य आहे.
मुलांना शिकवणारे तर मी असंख्य लोक बघितले आहेत पण शिक्षकांचे डोळे उघडणे, शिक्षकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणे, ज्या मुलांना आपण शिकवतो त्यांच्यासाठी आपल्या काय जबाबदाऱ्या आहेत वरखडपणे शिक्षकांना सांगणे, प्रामाणिकपणे लहान मुलांना घडवण्याची त्यांच्याकडून शपथ ग्रहण करणे, हे वसंता अनेक वर्षापासून करत आला आहे आणि आजही तो करतो आहे,
कारण वसंताला माहिती आहे जर देश घडवायचा असेल तर या लेकरांना घडवून खूप महत्त्वाचा आहे आणि लेकरांना घडवण्यासाठी आपल्याकडे शिक्षक प्रामाणिक असणं फार गरजेचं आहे.
चला माणूस घडवूया हे त्याचं अभियान अनेक वर्षापासून चालू आहे. आपल्या मुलांना डॉक्टर इंजिनियर नंतर करा आधी त्यांना चांगला माणूस म्हणून घडवा हे त्यांनी समाजामध्ये सगळ्यांच्या मनात बिंबवलं आहे,
वसंता कडे “अभिनयातून शिक्षण “याचं पेटंट आहे.
आणि आता नवीन अभ्यास अभियानाला त्यांनी सुरुवात केलेली आहे म्हणजे “चला जगू आनंदाने”.
श्रीकृष्णाचा ज्याला आशीर्वाद आहे, आई सरस्वती ज्याची माता आहे, जो स्वतः एक ऊर्जा, एक राजा, एक वादळ आहे
आणि त्याचा अश्वमेध कधीही थांबणार नाही.
परवा आमची सांगलीत वसंताची भेट झाली, आईनी माझ्या साठी त्याच्याबरोबर भाकरी आणि पिठलं डब्यात बांधून दिलं, पोट आणि मन भरून गेलं ,
ती ऊर्जा आणि प्रेम घेऊन पुन्हा काम करण्यासाठी ठाण्यात पोचलो”, असे मिलिंद गवळी यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.”

मिलिंद गवळी यांच्या या पोस्टचे नेटकाऱ्यानी भरभरून कौतुक केले आहे. अशा संस्कारांची आणि विचारांची सध्या समाजाला गरज असल्याचे देखील लोकांनी म्हटले आहे.

अधिक वाचा-
प्राण यांच्यासोबत रात्रभर हॉटेलमध्ये राहण्याची आलेली वेळ, बरं-वाईट होण्याच्या भीतीने थरथर कापत होती अभिनेत्री
गंमती गंमतीत झाले वांदे! प्राण यांनी अभिनेत्रीला अचानक खेचलेले पाण्यात, घाबरून तिनेही उचललेलं मोठं पाऊल

हे देखील वाचा