Friday, April 26, 2024

साउथ गॉसिप्स: यशपासून ते अल्लू अर्जुनपर्यंत ‘या’ अभिनेत्यांनी पहिल्या प्रेमासोबतच थाटलाय संसार

बॉलिवूड असो वा टॉलिवूड दोन्ही इंडरस्ट्रीमध्ये कलाकार आपलं एक लग्न कधीच टिकवत नाहीत. प्रत्येक कलाकाराचे एकापेक्षा जास्त मुलींबरोबर लग्न झालेले असते. अशी अनेक उदाहरणे देखील आहेत. चित्रपटांमध्ये काम करत मैत्रीचे रूपांतर प्रेमात होते. असे करतात करता अनेक अभिनेत्यांची ३ ते ४ लग्न देखील होतात. परंतु दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये असेही काही अभिनेते आहेत, ज्यांना पहिल्या भेटीत प्रेम झाले आणि त्यांनी ते टिकवत आपल्या प्रेमिकेशी लग्न देखील केले. या लेखामधून अशाच काही कलाकारांविषयी जाणून घेणार आहोत.

महेश बाबू
टॉलिवूडचा प्रिन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महेशने अभिनय क्षेत्रामध्ये दमदार कामगिरी केली आहे. अनेक अभिनेत्री त्याच्या रूपावर भाळलेल्या आहेत. परंतु महेशचा जीव नम्रता शिरोडकर या अभिनेत्रीमध्ये अडकला. एका चित्रपटादरम्यान तो नम्रताला भेटला आणि तिच्या प्रेमात पडला. या दोघांनी गुपचूप पद्धतीने एकमेकांबरोबर सात फेरे घेतले आणि लग्नगाठीत अडकले. दोघांना दोन गोड मुलं देखील आहेत. यांचा विवाह साल २००५ मध्ये झाला. (Rocking star Yash to Allu Arjun these tollywood actor’s married their first love)

अल्लू अर्जुन
दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये स्टायलिश हिरो म्हणून ओळखला जाणाऱ्या अल्लू अर्जुनची लव्हस्टोरी देखील चित्रपटांप्रमाणेच आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयासह स्टाईलने अनेक तरुणींची मने जिंकली आहेत. त्याने स्नेहा रेड्डी बरोबर साल २०११ मध्ये विवाह केला. एका मित्राच्या लग्नात त्याने स्नेहाला पाहिले होते. बघता क्षणी तो त्याचे हृदय तिला देऊन बसला. या दोघांची जोडी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

राम चरण
राम चरणने साल २०१२ मध्ये उपासना बरोबर लग्न केले. उपासना ही त्याचे पहिले प्रेमच नाही, तर बालपणीची मैत्रीण देखील आहे. हे दोघे एकत्रच लहानाचे मोठे झाले. त्यांच्यात घट्ट मैत्री होती. हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी बरेच दिवस एकमेकांना डेट केले आणि नंतर लग्न केले. दोघेही त्यांच्या संसारात सुखी आहेत.

यश
केजीएफ फेम यश जेव्हा रुपेरी पडद्यावर झळकला, तेव्हा त्याला पाहून अनेक जण भारावून गेले होते. अनेक तरुणी त्याच्यावर फिदा झालेल्या आहेत. अनेक मुली आजही त्याच्याबरोबर लग्न करण्याचे स्वप्न बघतात. परंतु त्याचे मन अभिनेत्री राधिका पंडितमध्येच अडकलेले आहे. एका मालिकेच्या शूटिंग दरम्यान या दोघांची भेट झाली होती. साल २०१६ मध्ये त्यांनी विवाह केला.

थलापती विजय
दाक्षिणात्य चित्रपटामधील ‘अपडी पोडे’ या गाण्याने सर्वांनाच वेड लावले होते. या गाण्यामुळे आणि त्याच्या अभिनयामुळे विजयने लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य केले. अशात त्याने त्याची फॅन असलेली संगीता बरोबरच विवाह केला. साल १९९९ मध्ये या दोघांनी विवाह केला. आज त्यांच्या लग्नातला २२ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. दोघेही त्यांच्या आयुष्यात खूप सुखी आहेत. त्यांना दोन गोड मुलं देखील आहेत.

धनुष

धनुषने रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या बरोबर विवाह केला. दोघे एका समारंभात भेटले होते. तिथेच धनुष तिच्या प्रेमात पडला. या दोघांमध्ये पहिले मैत्री झाली. त्यानंतर कुटुंबियांच्या संमतीने त्यांनी साल २००४ मध्ये विवाह केला. दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-चार वर्षांची असताना दिव्या दत्ताने पाहिले होते ‘हे’ स्वप्न; ‘अशा’प्रकारे ‘शब्बो’ने मारली रुपेरी पडद्यावर एन्ट्री

-विजय देवरकोंडाने वाढदिवसानिमित्त आईला दिली ‘ही’ अनोखी भेट; पाहुन तुम्हीही व्हाल स्तब्ध

-ओटीटी प्लॅटफॉर्मवर होणार फेस्टिवल धमाका! ऑक्टोबरमध्ये भेटीला येतायेत ‘हे’ चित्रपट अन् वेब सीरिज

हे देखील वाचा