Saturday, April 20, 2024

‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पूर्ण, पोस्ट शेअर करत सिद्धार्थ चांदेकरने मानले आभार

प्रेमाच्या अनेक परिभाषा आपल्याला मालिका तसेच चित्रपटातून पाहायला मिळाल्या आहेत. मात्र, स्टार प्रवाहवरील ‘सांग तू आहेस का’ या मालिकेने एक अनोखी प्रेमकहाणी प्रेक्षकांसमोर आणली. ही थरारक प्रेमकहाणी प्रेक्षकांना देखील खूप आवडली होती. अल्पावधीतच मालिकेने खूप प्रसिद्धी मिळवली. अशातच या मालिकेचा शेवटचा भाग शूट झाला आहे. यानिमित्त मालिकेत मुख्य भूमिकेत असणारा स्वराज म्हणजे अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

सिद्धार्थने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या संपूर्ण टीमचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “आज शूटिंगचा शेवटचा दिवस. आयुष्यभर लक्षात राहील असा प्रवास. स्टार प्रवाह आणि इरीस प्रोडक्शनचे जितके आभार मानावे तितके कमीच आणि सगळ्यात जास्त तुमचे आभार. तुम्ही भरभरून प्रेम दिलंत, म्हणून इथपर्यंत पोहोचू शकलो. लवकरच आणखी काहीतरी नवीन घेऊन येईन तुमच्यासाठी.” (Sang Tu Aahes Ka serial’s last episode shoot, siddharth chandekar give thanks to audience)

त्याने शेअर केलेल्या या पोस्टवर या मालिकेचे चाहते अनेक प्रतिक्रिया देत आहेत. मालिका खूप लवकरच संपली यामुळे चाहते नाराजी व्यक्त करत आहेत. मालिकेची प्रेमकहाणी वेगळी असल्यामुळे प्रेक्षकांना देखील खूप आवडली होती. त्यामुळे मालिका आणखी काही वर्ष चालावी अशी प्रेक्षकांची अपेक्षा होती.

मालिकेचा पहिला भाग ७ डिसेंबर, २०२० रोजी प्रदर्शित झाला होता. अवघ्या दहा महिन्यात ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. स्वराजची मृत पावलेली पत्नी वैभवी हिचा आत्मा घरातच वावरत असतो. सगळ्यांना वाटते की, तिचा अपघाती मृत्यू झाला आहे, पण तिला प्लॅनिंग करून मारण्यात आले होते. तिचा आत्मा तृप्त न झाल्याने तो घरातच असतो. मात्र, तिला स्वराजला तिच्या मृत्यूचे सत्य सांगता येत नाही. नंतर डॉक्टर वैभवी हिच्या माध्यमातून ती सगळे सत्य घरच्यांसमोर आणते. या मालिकेत सिद्धार्थ जाधव, शिवानी रांगोळे, सानिया चौधरी हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. मालिकेतील त्या तिघांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘रंग माझा वेगळा’ मालिकेने गाठला ५०० एपिसोड्सचा टप्पा, कलाकारांनी ‘अशा’प्रकारे साजरा केला खास क्षण

-ड्रग्ज प्रकरणी अभिनेता गौरव दीक्षितला मिळाला जामीन, पण कोर्टाने दिल्या ‘कडक’ सूचना

-कृष्णा अभिषेकने असे काय केले की, नेहा कक्करला कोसळले रडू? पाहा ‘हा’ व्हिडिओ

हे देखील वाचा