बिग बॉस ओटीटीचा दुसरा ‘वीकेंड का वार’ खूप धमाकेदार झाला. या भागात करण जोहर पुन्हा एकदा अनेक स्पर्धकांची शाळा घेताना दिसला. त्याचवेळी करण झीशानवर देखील रागवताना दिसला. या भागात पुन्हा एकदा करण शमिता शेट्टीची बाजू घेताना दिसला. त्यानंतर सोशल मीडियावर युजर्स त्याला शमिताचे वकील म्हणत असल्याचे दिसून आले.
करणला म्हटलं जातंय शमिताचा वकील
रविवारच्या भागात जेव्हा करण जोहरने शमिताची बाजू घेतला हे पाहुन सोशल मीडियावर त्याला जोरदार ट्रोल केलं जातंय. एका युजरने करण जोहरला शमिताचा वैयक्तिक वकील म्हटले आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, “गेल्या वेळीही करणने फक्त दिव्या आणि प्रतीकला फटकारले होते आणि शमिताला साथ दिली होती.” (In Bigg Boss OTT, Karan Johar had to take the side of these contestants)
Wow.. Last time #KaranJohar grilled #DivyaAgarwal #PratikSehajpal beyond limit.
But look how he is defending #ShamitaShetty. He actually has became a personal advocate for her
He spoonfed shamita with ghe wed baggage for an excuse.#BiggBossOTT
— Chetana????No Diplomacy (@Chetana_CND) August 22, 2021
Why only #ShamitaShetty is allowed to speak @karanjohar ??
Tumko bhi link chahiye kia ????????#BiggBossOTT— ???????????????????????? ???????????????????????? ???? (@Iamfatimashaikz) August 22, 2021
सोशल मीडियावर करणला विचारले जातायेत प्रश्न
त्याच वेळी एका युजरने लिहिले की, “करणसोबत बोलण्याचा अधिकार फक्त शमितालाच का आहे?” या व्यतिरिक्त एका युजरने असेही लिहिले की, “करण जोहर स्वत: ला खरा म्हणवतो, परंतु तो नेहमीच शमिताचा वैयक्तिक होस्ट म्हणून दिसतो.”
Karan Johar calls himself fair and then behaves as Shamita shetty's personal host ????
Irony died thousand death today#BiggBossOTT #BBOTT #ShamitaShetty#PratikSehejpal #PratikFam— Aini ✨ (@Nam12100038) August 22, 2021
#BiggBossOTT LIVE
Watch for Episode 15 Review Debate, 22nd August
was #KaranJohar too protective for #ShamitaShetty? & ignoring everyone else?https://t.co/IqqkGkTxxD#PratikSehajpal #NishantBhat #RidhimaPandit #NehaBhasin #MooseJattana #AksharaSingh #bbott #RaqeshBapat
— Chetana????No Diplomacy (@Chetana_CND) August 22, 2021
करण-रिद्धिमा घरातून बाहेर
हा भाग धमाकेदार होण्याबरोबरच एक धक्कादायक गोष्टही यामध्ये घडली आहे. या वीकेंडच्या वारमध्ये करण नाथ आणि रिद्धिमा पंडित यांना कमी मतांमुळे घरातून बाहेर जावे लागले. जो कुटुंबातील प्रत्येक सदस्यांसाठी मोठा धक्का होता.
राखीने करणला म्हटले कमकुवत स्पर्धक
दोन स्पर्धक शोमधून गेल्यानंतर कुटुंबातील सदस्य खूप भावूक झाले आणि रडत रडत त्यांनी करण आणि रिद्धिमाला निरोप दिला. त्याचवेळी, मनोरंजनाचा तडका देण्यासाठी शोमध्ये आलेल्या राखी सावंतला शोचा सर्वात कमजोर स्पर्धक करण नाथ हा वाटला. तिने करणला बाहेर पडण्यापूर्वी घरात मोकळेपणाने खेळण्याचा सल्ला देखील दिला होता. तर राखीचा सल्ला स्वीकारण्यापूर्वीच तो शोमधून बाहेर पडला.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तालिबान्यांना राखी बांधू इच्छिते ‘ही’ अभिनेत्री; म्हणाली, ‘आयडिया कशी वाटली मोदीजी?’
-अफगाणिस्तान संकटात असताना व्हायरल होतोय ‘रेम्बो ३’ चित्रपटाचा ‘हा’ सीन; काय आहे नेमकं कारण?