‘दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं’ अशी म्हण आहे. ही म्हण कदाचित बॉलिवूडलाही लागू होते. कारण, बाहेरून झगमगाटी वाटणारे बॉलिवूड रहस्यांनी भरलेले आहे. बॉलिवूडच्या रहस्यांबद्दल अनेक कलाकारांनी बेधडकपणे भाष्य केले आहे आणि याची काळी बाजू लोकांसमोर आणली आहे. अशीच एक अभिनेत्री आहे, जिने बॉलिवूडमधील काळ्या बाजूचा एका मुलाखतीत खुलासा केला होता. ती अभिनेत्री म्हणजेच महिमा चौधरी होय. महिमाने इंडस्ट्रीवर बोट ठेवत सांगितले होते की, इंडस्ट्रीला ‘व्हर्जिन’ अभिनेत्री हवी असायची, जर ती ‘व्हर्जिन’ नसेल, तर तिची कारकीर्द संपून जायची. चला संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया.
महिमाने 1997मध्ये केले बॉलिवूड पदार्पण
अभिनेत्री महिमा चौधरी (Mahima Chaudhry) हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे 1997 सालचा ‘परदेस’ होय. याच सिनेमातून महिमाने बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकले होते. या सिनेमाचे दिग्दर्शन सुभाष घई (Subhash Gai) यांनी केले होते. सिनेमात महिमाचा नायक शाहरुख खान (Shahrukh Khan) होता. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांची तुफान पसंती मिळाली होती. ती एका रात्रीत स्टार बनली होती. मात्र, तिला या सिनेमातून जसे स्टारडम मिळाले, तसे पुढे जाऊन मिळाले नाही.
महिमाने माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक खुलासा केला होता की, बॉलिवूड आणि त्यात काम करण्याच्या पद्धतीत किती बदल झाला आहे. तसेच, बॉलिवूडमध्ये आधी पुरुषांचं वर्चस्व असल्याचेही तिने सांगितले.
‘महिला केंद्रित सिनेमे बनतायेत’
तिने माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, “मला वाटते की, बॉलिवूड आधीच्या तुलनेत आता खूपच बदलले आहे. आज बॉलिवूडमध्ये महिला केंद्रित सिनेमे बनवले जात आहेत. महिला अभिनेत्रींना आधीच्या तुलनेत आता मोठ्या भूमिकांच्या ऑफर मिळत आहेत. त्यासाठी त्यांना बक्कळ मानधनही दिले जात आहे. आधीच्या तुलनेत आता त्यांचे वैयक्तिक आयुष्य त्यांच्या कारकीर्दीवर परिणाम करत नाही.”
‘व्हर्जिन नसाल, तर कारकीर्द संपते’
महिमा सांगते की, त्यावेळी इंडस्ट्रीला ‘व्हर्जिन’ अभिनेत्री पाहिजे असायच्या. ती पुढे म्हणाली होती की, “जर आधीच्या बॉलिवूडमध्ये एखादी अभिनेत्री तिच्या वैयक्तिक आयुष्यात कुणाला डेट करत असेल, तर तेव्हा चर्चा व्हायची की, ओहह! शिट यार, ही तर डेट करत आहे! त्यांना अशा अभिनेत्री हव्या असायच्या, ज्या व्हर्जिन असतील आणि त्यांनी कुणाला किसही केले नसावे. जर तुम्ही लग्न केले, तर तुम्ही समजून जावा की, तुम्हाला काम मिळणे बंद होईल. तसेच, जर तुम्हाला मुलंबाळं असतील, तर तुमची कारकीर्द कायमची संपते.”
View this post on Instagram
अभिनेत्रीचा आगामी सिनेमा
महिमा चौधरीच्या हिट सिनेमांबद्दल बोलायचं झालं, तर त्यात ‘दाग: द फायर’, ‘दिल है तुम्हारा’ आणि ‘ये दिल क्या करे’ यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे. दीर्घ काळ रुपेरी पडद्यापासून दूर असणारी महिमा आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. ती अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) हिच्या ‘इमर्जन्सी’ (Emergency) या आगामी सिनेमात दिसणार आहे. यामध्ये श्रेयस तळपदे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत आणि अनुपम खेर जयप्रकाश नारायण यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘अगं अगं आई…’, म्हणत प्रेक्षकांना पोट धरून हसवणारा ओंकार दिसणार मुख्य भूमिकेत, पण नायिका कोण?
प्रत्येक रहस्य कधी ना कधीतरी उलगडतंच ! जाणून घेऊया ‘व्हिक्टोरिया’चे रहस्य
“ज्या जनतेनं त्यांना स्टार बनवलं, तीच त्यांना…”; बॉलिवूडवर प्रकाश झा पुन्हा बरसला